Sunday, June 12, 2016

वीज निर्माते व्हा, पैसेही कमवा!

वीज निर्माते व्हा, पैसेही कमवा!
मोठ्या उद्योगांप्रमाणेच घराच्या छतावर ऊर्जानिर्मिती प्रकल्प साकारण्याची योजना महावितरणने आणली आहे. केवळ 75 हजार ते 1 लाख रुपये गुंतवून पैसे www.surbhisystems.in कमावण्याची संधी या उपक्रमाद्वारे सर्वसामान्यांना उपलब्ध झाली आहे. या योजनेतील कायदेशीर अडसरही राज्य शासनाने जाहीर केलेल्या अधिसूचनेमुळे दूर झाला आहे.

सौरऊर्जा निर्मितीची परवानगी आतापर्यंत केवळ उद्योगांनाच होती. आता, मात्र निवासी, वाणिज्य, औद्योगिक वसाहती आणि हाउसिंग सोसायट्यांना छतावर वीजनिर्मिती करता येईल. वापरानंतर वाचलेली वीज महावितरणला विकताही येणार आहे. त्यासाठी आवश्‍यक संयंत्रे सहज उपलब्ध आहेत. या संयंत्रांपासून दररोज एक ते आठ किलोवॉट वीजनिर्मिती करता येते. सिंगल फेस ग्राहक आठ किलोवॉट, थ्री फेस ग्राहक 150 किलोवॉट वीज निर्माण करू शकतो. www.surbhisystems.in महानगरपालिका हद्दीतील ग्राहक 150 किलोवॉट ते 1 मेगावॅट वीज निर्माण करू शकतो. महापालिका हद्दीबाहेरील ग्राहक 80 किलोवॉट ते 1 मेगावॅट वीजनिर्मिती करू शकतो. दिवसा निर्माण होणारी वीज गरजेपेक्षा निश्‍चितच अधिक राहील. न वापरलेली वीज नेटमीटरिंगद्वारे महावितरणला विकता येईल.
या योजनेसाठी महावितरणकडे अर्ज करणे आवश्‍यक आहे. महावितरणने ग्राहकांच्या सुविधेसाठी ऑनलाइन अर्जाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. www.surbhisystems.in लिफ्ट, पाण्याची मोटार व लाइटसाठी ही वीज वापरता येईल. सध्या विजेचा दर सरासरी सात रुपये युनिट असा आहे. या हिशेबाने सोसायटीचे एका युनिटमागे तासाला सात रुपये वाचतील. अधिक माहिती महावितरणच्या www.mahadiscom.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

सौर ऊर्जा : गरम पाणी व विजेला पर्याय

सौर ऊर्जा : गरम पाणी व विजेला पर्याय
५ तारखेला पर्यावरण दिन आहे. महाराष्ट्र शासन ३ जून ते ९ जून पर्यंत पर्यावरण सप्ताह साजरा करीत आहे त्यानिमित्ताने..............
आजच्या दैनंदिन जीवनात प्रत्येक क्षणासाठी आपल्याला विजेची गरज भासते. वाढत्या नागरिकीकरणामुळे व त्याचबरोबर सतत वाढणारी लोकसंख्या यामुळे विजेचा वापर प्रचंड प्रमाणात वाढला. पण सध्या अस्तित्वातील वीजनिर्मितीची क्षमता अपुरी पडत आहे. यासाठी सूर्यापासून येणाऱ्या ऊर्जेचा उपयोग करून घेणे हाच यावर एकमेव उपाय आहे. म्हणूनच अपारंपरिक ऊर्जेचा होणारा वापर हा भावी काळासाठी गरजेचा व बचतीचा महामंत्र होऊ बसला आहे.
खालील प्रकारच्या उर्जा आपल्याला सूर्यापासून मिळवता येतात:
१) उष्ण उर्जा (Solar Thermal)
२) प्रकाशीय उर्जा (फोटोव्होल्टाइक/Photovoltaic)
दैनंदिन घरगुती वापराकरिता सौर ऊर्जेचा वापर शक्यतो तीन कारणांसाठी करता येतो. त्यापैकी एक म्हणजे गरम पाण्यासाठी ‘सोलर हिटर’ अन्न शिजविण्यासाठी “सोलर कुकर” व घरात लागण्यार्या विजेच्या उपकरणांच्या “वीजनिर्मितीसाठी” करता येऊ शकतो. त्यामुळे सामान्य नागरिक आपल्या दैनंदिन वापराकरिता सौर उर्जेचा उपयोग गरम पाणी, अन्न शिजविण्याकरिता व वीज वापर  करण्याकरिता करू शकतात आणि नैसर्गिक ऊर्जेचा लाभ घेऊन बचतीचा नवा मार्ग अवलंबू शकतात.
सौर ऊर्जेवर चालणारी उपकरणे व त्याचा उपयोग
१) सौर उष्ण जल प्रणाली (Solar Water Heating System).
आंघोळीसाठी बहुतेक कुटुंबातून गरम पाण्याचा वापर केला जातो. हे गरम पाणी करण्यासाठी गावी बंब अथवा चुलीवर गरम पाणी करण्याची पद्धत आजही अस्तित्वात आहे. तसंच शहरी भागात इलेक्ट्रिक गिझर, गॅस गिझर अथवा गॅस शेगडीचा वापर केला जात आहे. पण दिवसेंदिवस इंधनटंचाई, वीजटंचाईची समस्या गंभीर होताना आपण पाहत आहोत. तसंच इंधनाचे साठे मर्यादित असल्याचेही संकेत आपल्याला मिळू लागले आहेत. इंधनांवर असलेल्या मर्यादा आणि उपलब्धता यामुळे स्वयंपाकाचा गॅस, केरोसीन, पेट्रोल, डिझेल इत्यादींच्या किमती झपाटय़ाने वाढत आहेत. विजेचं भारनियमन वाढलं आणि चौदा तासांपर्यंत वीज नाहीशी होऊ लागली. त्यामुळे सकाळी आंघोळीसाठी गरम पाणी मिळवण्यात अडचणी समोर येऊ लागल्या. या सर्व अडचणी सर्वत्रच सारख्या आहेत. त्यामुळे या समस्येवर उपाय आहे सौरबंब म्हणजेच सोलर वॉटर हीटर. सूर्यापासून येणाऱ्या उष्ण ऊर्जेचा वापर पाणी गरम करण्यासाठी उपयोग केला जातो. या प्रकारात सूर्यापासून येणारी उष्णता हिटिंग पॅनेल/नाळ्यामध्ये घेऊन सहजरीत्या थंड पाणी ८० अंश से. पर्यंत उष्ण करता येऊ शकते. यामध्ये कोणताही इंधनखर्च, वीजखर्च लागत नसून अतिशय कमी देखभाल खर्च लागतो. या सिस्टीमचे आयुष्य साधारणपणे ८ ते १० वर्षे असते. फक्त सुरुवातीला एकदाच गुंतवणुकीची गरज असते.
सौरबंब प्रणालीमध्ये साधारणपणे दोन प्रकार आहेत: एफ.पी.सी. (Flat Plate Collector) व ई. टी. सी. (Evacuated Tubular Collector). पैकी एफ.पी.सी. हा प्रकार पूर्वीपासून वापरला जाणारा व संपूर्णत: भारतीय बनावटीचा सौर बंब आहे. तर  ई. टी. सी. हा गेल्या काही वर्षांत लोकप्रिय झालेला पण चिनी बनावटीचा सौरबंब आहे. एफ.पी.सी. हा अधिक मजबूत व जास्त टिकाऊ आहे, पण त्यामध्ये वापरल्या जाणाऱ्या तांबे व इतर धातूंमुळे त्याची किंमत थोडी जास्त असते. तसेच धातूच्या पाइपमुळे  पाण्यातील क्षारांचा परिणाम होऊन प्रणाली कालांतराने बंद पडण्याचा धोका असतो अर्थात, ठराविक काळाने हे पॅनल्स साफ केल्यास फारशी अडचण येत नाही.
ई. टी. सी. प्रणाली ही वजनाने हलकी व किमतीला तुलनेने बरीचशी कमी असते, पण त्याचबरोबर थोडी नाजूकही असते. तसेच ती काचेच्या नळ्यांची बनविलेली असल्याने जेथे पाणी क्षारयुक्त आहे तेथे जास्त उपयोगाची ठरते. नवीन तंत्रज्ञान असल्याने त्याची कार्यक्षमता खूप चांगली आहे. अर्थात, प्रत्येक प्रणालीचे आपापले गुण व दोष असल्याने आपली गरज, भौगोलिक परिस्थिती, पाण्याची गुणवत्ता व सर्वात महत्त्वाचे आपले बजेट, या सर्व गोष्टींचा विचार करून निर्णय घेणे योग्य!
सोलर काचेच्या नळ्यावर किंवा पॅनल्सवर पक्षी विष्ठा टाकतात किंवा धूळीचा थर बसून पुरेसे ऊन पॅनल्स/नळ्यांवर पंडत नाही, त्यावेळी पाणी गरम होण्यास जास्त वेळ लागतो. म्हणूनच महिन्यातून एकदा काच पाण्याने धुवून स्वच्छ करावी लागते.
या मर्यादा लक्षात घेऊन जर ह्या सौर वॉटर हिटरचा वापर केला तर तुम्हाला चोवीस तास केंव्हाही गरम पाणी तर मिळेलच पण तीन वर्षात केलेला खर्च भरून निघेल व उर्वरित आयुष्यभर जवळपास मोफत गरम पाणी मिळेल हे नक्की.
उदा : एका घरात ५ माणसे याप्रमाणे एकासाठी २५ लिटर्स पाणी याप्रमाणे १२५ लिटर्स पाणी आंघोळीसाठी लागते. १२५ लिटर्स पाणी प्रतिदिनप्रमाणे प्रणाली घेणे आवश्यक असते. पण त्याच ५ पैकी ४ जणांनी दिवसात संध्याकाळी जर का पुन्हा आंघोळ केली तर त्यांनी वापरलेल्या गरम पाण्याच्या बदल्यात थंड पाणी गरम पाण्याच्या टाकीत जमा होत असते व भल्या पहाटे सूर्य नसल्याने ते पाणी गारच राहते व जेव्हा ते ५ जण सकाळी आंघोळीसाठी गेल्यास त्यांना थंडच पाणी मिळणार व असे लोक गरम पाणी मिळत नसल्याची ओरड करतात किंवा घरामध्ये अतिरिक्त माणसे आल्यास केवळ ५ व्यक्तींकरिता डिझाईन केलेली सयंत्र पुरेसे पडत नाही किंवा तसं पाहिलं तर एक वेळच्या आंघोळीचे पाणी उपलब्ध असताना त्याचा दोन वेळेस वापर केल्याने प्रणाली अयशस्वी होत असते याकडे कोणाचेही लक्ष नसल्याने सौर ऊर्जा काही कामाची नाही असा सर्वाचा गैरसमज होऊ शकतो, पण हे चुकीचे असून जास्त गरम पाणी व जितक्या वेळी पाहिजे असल्यास त्याप्रमाणे प्रणालीचे डिझाईन करून घेतल्यास योग्य लाभ दरवेळेस सहज घेता येतो. असे गैरसमज पसरवू नये याकरिता जास्त क्षमतेची सोलर सिस्टीम घेणे भाग असते. जर वरील प्रमाणे १२५ लिटर्स पाणी प्रतिदिन आवश्यक्यता असेल तर आम्ही २५० लिटर्स पाणी प्रतिदिन खरेदी करावयाचा सल्ला देतो. कारण जेव्हा आपण एक बादली पाणी काढल्यानंतर तेवढेच पाणी गरम पाणी वितरण केलेल्या पाईपा मध्ये साठून राहते आणि कालांतराने पाईप मधील पाणी थंड होण्याचा संभव असतो. तसेच प्रणाली गच्चीवर ठेवण्यासाठी जागेची गरज लागते. याशिवाय गरम पाणी घराध्ये देण्यासाठी स्वतंत्र पाईपलाईन करावी लागते. पण यामध्ये सयंत्राची किंमत व संपूर्ण आस्थापना करावयाची असल्याने सुरुवातीलाच गुंतवणूक लागते. याव्यतिरिक्त पुढे कोणत्याही वर्षी इंधन खर्च, पुनर्गुतवणूक, विजेची बिले, महागाई, इ.चा त्रास कमी व नाहीसा होऊन त्यावर सहज मात करता येऊ शकते. पावसाळ्याचे काही दिवस वगळले तर उन्हाळ्यात सिस्टीम सतत कार्यरत रहाते तसेच हिवाळ्यातील काही दिवसांचा अपवाद सोडल्यास सौर ऊर्जेचा यथायोग्य वापर करणे सहज शक्य आहे. परंतु आज तंत्रज्ञान विकसित झालेले आहे त्यामुळे काही सयंत्रामध्ये हवेतील/ वातावरणातील उष्णता शोषून पाणी गरम केले जाते.
सौर वॉटर हिटर सिस्टीम खूप खर्चिक आहे हि दुसरी ओरड या बाबतीत ऐकावयास मिळते. यासाठी एक छोटे उदाहरण देऊ इच्छितो की, आपण ५०-६० हजारांची दुचाकी खरेदी करतो त्यानंतर त्या मध्ये ५० रु. प्रतिलिटर पेट्रोल भरून गाडीचा उपयोग केला जातो व वेळच्या वेळी मेंटेनन्ससुद्धा करावा लागतो. त्याशिवाय दुसरा पर्याय नसतो. पण सौर ऊर्जेसाठी फक्त एकदाच गुंतवणूक करावी लागते व पुढे फक्त मोफत ऊर्जा.. मोफत वीज व फक्त मोफत गरम पाणी.............
आजमितीला सुमारे ४० ते ५०% कुटुंबे पाणी गरम करण्यासाठी एलपीजी गॅसचा वापर करतात. घरातील ऊर्जेच्या वापराचा विचार करता अन्न शिजवणे, पाणी गरम करणे यावर जास्तीत जास्त ऊर्जा खर्च केली जाते. काही कुटुंबे इलेक्टि्रक गीझरचा वापर करतात. त्यामुळे फक्त पाणी गरम करण्यासाठी दर वर्षी पाच माणसांच्या कुटुंबाला सुमारे १५०० युनिट विजेचा वापर करावा लागतो. या विजेची किंमत सात ते साडेसात हजार रुपये इतकी मोजावी लागते आणि दिवसेंदिवस इलेक्ट्रिसिटीचा दर वाढत चालला आहे हे हि लक्षात घ्यावे लागेल. याशिवाय पर्यावरणाच्या दृष्टीकोनातून बघितल्यास एका कुटुंबाकडून वर्षाकाठी प्रचंड हानी झालेली असते. हा सर्व हिशोब बघता विजेवर चालणाऱ्या गीझरपेक्षा सोलर वॉटर हीटर किती फायदेशीर आहे हे कळते, ज्यामुळे २.५ ते ३ वर्षात किंमत वसूल तर होतेच, शिवाय किमान १० वर्षे कोणताही खर्च न करता पाणी गरम मिळते आणि प्रदूषणापासून दूर ठेवते. सौर वॉटर हिटर सिस्टीमवर केलेला खर्च सदनिकेच्या खरेदीच्या तुलनेत नगण्य असतो. त्यामुळे आपल्या इमारतीवर असे संयंत्र बसवून घेणे खूप फायद्याचे असते.
संपूर्ण सुरक्षित व अल्प देखभाल, दीर्घारुषी आणि प्रदूषणविरहित असे हे संयंत्र आहे. सौर उष्णजलसंयंत्रच्रा विविध महानगरपालिका व नगरपालिकानी नवीन गृहप्रकल्पांसाठी सौर उष्णजलसंरंत्र आस्थापित करण्राचे अनिवार्य (बंधनकारक) केले असून महापालिकांनी मिळकत करामध्ये सवलत देत आहे.
जसा, आज खोट्या प्रतिष्ठेच्या लोभापायी लोकं ५०-५० हजाराचे मोबाईल घेतात, का तर उंचा मोबाईल वापरणे हे प्रेस्टिज सिंबल (Prestige Symbol) बनलेला आहे (भले, मोबाईल मधील काही समजेना का?). आज मी आवाहन करतो कि जसा उंचा मोबाईल वापरणे हे प्रेस्टिज सिंबल आहे, तसा माझ्या घरावर सौर उर्जेची यंत्रणा बसवलेली आहे. हा हि एक प्रेस्टिज सिंबल बनवा, आपण रोजचे जर ४ युनिट वाचविले तर पर्यायाने आपल्या, जिल्ह्याच्या, राज्याच्या आणि देशाच्या विकासात हातभार लागू शकतो, पण गरज आहे, हा विस्तृत विचार करण्याची...................    
२) सौर प्रकाशीय उर्जा वीजप्रणाली (Solar Photovoltaic Power System).
सौर ऊर्जेला अनन्यसाधारण महत्त्व का प्राप्त होत आहे, असा जर विचार केला तर असे समजते की भारत देश विषुववृत्ताच्या जवळ आहे. सूर्य विषुववृत्तापासून उत्तरायणात उत्तरेकडे आणि दक्षिणायनात दक्षिणेकडे सरकलेला दिसतो. या काळातही सूर्याकडून येणारे किरण भारतावर पडताना लंबरूप असतात. या किरणांची कार्यक्षमता सर्वाधिक असल्याने भारत हा देश सौर ऊर्जेचा देश म्हणून ओळखला जातो. सुमारे ३२५ दिवस उत्तम सूर्यप्रकाश आणि उष्णता मोफत मिळत असल्याने सौर ऊर्जेच्या वापराकडे सर्व देशवासीयांनी समाजाभिमुख होऊन लक्ष द्यायला हवे. दर दिवशी सूर्याकडून १ चौ.मी. क्षेत्रफळावर १ किलोवॉट प्रतितास एवढी विद्युतऊर्जा मिळत असते. उदाहरणच द्यायचे म्हटले, तर या ऊर्जेत १०० वॉटचा एक दिवा १० तास चालू शकतो, इतकी क्षमता त्यात असते. वीजनिर्मितीकरिता, पाणी गरम करण्याकरिता, अन्न शिजवण्याकरिता, वेगवेगळे पदार्थ वाळवण्याकरिता, औद्योगिक क्षेत्रातील निरनिराळया कामांकरिता आपण या क्षेत्रफळावर पडणाऱ्या सौर ऊर्जेचा वापर करू शकतो. आजमितीला सौर ऊर्जेविषयी भारतात आशादायी वातावरण निर्माण होत आहे. परंतु हा वेग अतिशय मंद आहे. ज्या पध्दतीने ग्लोबल वॉर्मिंगचे चटके बसू लागले आहेत, त्या तुलनेत समाजात त्या विषयीची जागरूकता, त्या विषयीच्या उपाययोजना करण्याबाबत समाजात अनास्था दिसून येत आहे.
एकटया महाराष्ट्राचा विचार करता आपल्याला सुमारे उत्पादित वीज आणि विजेची मागणी यामध्ये पचंड तफावत आहे. परिणामी अनेक खेडेगावांमध्ये भारनियमनाच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे अनेक कारखाने, शेती व्यवसाय, लघुउद्योग अडचणीत आले आहेत. सौर वीजनिर्मिती हा यावर उत्तम पर्याय असून वैयक्तिक पातळीवर सौर वीजयंत्रणा बसवता येणे शक्य आहे. या यंत्रणेकरिता एकदाच गुंतवणूक करावी लागते. गुंतवणूक करताना आपण किती दिवे, पंखे - किती वॉटचे आणि किती काळ चालवणार आहोत, त्यावर वीजनिर्मिती किती झाली पाहिजे ते ठरवले जाते. आजमितीला किमान प्रकाश देणारा छोटा दिवा रु. १२०० पासून बाजारात उपलब्ध आहे. तसेच ३ दिवे आणि १ टेबल फॅन ३-४ तास चालेल अशा प्रकारचे संच फक्त रु. १५,०००/- मध्ये उपलब्ध आहेत.
केरोसीनचा दिवा वापरणाऱ्या कुटुंबाला असा छोटा संच घेता येणे निश्चित शक्य असून दर दिवशीचे किमान ५ रुपयांचे, तर वर्षाचे किमान १५०० रुपयांचे केरोसीन यामुळे वाचू शकेल. पुढील काळात फक्त ३०० रुपये वर्षाकाठी खर्च केले, तर हा छोटा दिवा किमान १५ वर्षे चालू राहू शकेल. तसेच दुसऱ्या संचाचा विचार केल्यास दर दिवशी १५ रुपयांची बचत झाल्याने दर वर्षी किमान ४५०० रुपयांची बचत होणार असून तीन वर्षात या संचाची किंमत वसूल होऊ शकते. याच प्रकारची सौर वीज यंत्रणा सोसायटीतील जिन्यांमध्येही बसवता येते. किफायतशीर आणि पर्यावरणस्नेही असल्याने महाराष्ट्रातील हजारो सदनिकांच्या गच्चीवर ही यंत्रणा बसवणे बंधनकारक केल्यास महाराष्ट्रातील विजेचा तुटवडा मोठया प्रमाणावर कमी होऊन उद्योगधंद्यांना हा पुरवठा करून उत्पन्नवाढीस चालना देणे शक्य होईल.
आपल्या देशात अजूनही सुमारे ६५% जनता ग्रामीण भागात राहत असून १८ कोटी कुटुंबे अन्न शिजवण्यासाठी जंगलातील लाकूडफाटा वापरतात. हे इंधन गोळा करण्यासाठी दर आठवडयाला १६ ते १६ तास खर्च करतात. शिवाय या लाकडाचे ज्वलन होताना धूर निर्माण होतो. या धुरामुळे दर वर्षी सुमारे ५ लाख गृहिणींना आपला जीव गमवावा लागतो, ही बाब सर्व जनतेसमोर कधी येतच नाही. शिवाय वातावरणात लाखो टन कार्बन डायऑॅक्साईड सोडला जातो त्याचा हिशोबही आपल्याला कळत नाही, पण त्यांचे दुष्परिणाम मात्र सर्वांना सोसावे लागतात हे निश्चित. या विषयीची जाणीव या समाजात होणे गरजेचे आहे. कारण खेडेगावातील समाज हा परंपरागत प्रथांमध्ये रूढ झालेला आहे. त्याला बदलणे मात्र काळाची गरज आहे. हे फक्त स्वयंपाकाच्या इंधनाबद्दल झाले. असाच विचार करता अजून ज्या ठिकाणी वीज पोहोचूच शकली नाही, असाही ग्रामीण परिसर आपल्या देशात आहे. सुमारे ८ कोटी कुटुंबे केरोसीन दिव्याचा वापर करतात. यामुळे प्रत्येक कुटुंब दरमहा ४ लीटर, तर वर्षाला ५० लीटर केरोसीनचा वापर करते. म्हणजे सुमारे १५०० रुपयांचे इंधन वापरले जाते. याचाच अर्थ दर वर्षी सुमारे ४० कोटी लीटर केरोसीन फक्त प्रकाश मिळवण्यासाठी खर्च होते. यातून ९.६ कोटी टन एवढा कार्बन डायऑक्साईड वातावरणात मिसळून पर्यावरणाला हानी पोहोचवली जात आहे. हे वास्तव आणि शहरातील वास्तव सारखेच आहे. शहरात आर्थिक समृध्दीच्या जोरावर वाहनांचा - पर्यायाने इंधनांचा वापर, वातानुकूलित दालनांचा नको तेवढा वापर आणि दिव्यांचा झगमगाट ही पर्यावरणाला हानी पोहोचवणारी यंत्रणा अस्तित्वात आहे. वरील ग्रामीण आणि शहरी उदाहरणे आपलीच असून आपणच आपल्याला कसे विनाशाकडे नेत आहोत, याची उदाहरणे आहेत.
याचा उपयोग घरातील प्रकाश पुरवठय़ासाठी केला जातो. दररोज ३ ते ५ तास सौर प्रकाश पुरवठा वेगवेगळ्या प्रणालीनुसार मिळविता येतो. शुद्ध सिलिकॉनच्या पातळ चकत्या वापरून सौर पॅनेल बनवतात. या पॅनेलमध्ये सौर ऊर्जेचे विद्युत ऊर्जेत रूपांतर करता येते. दुर्गम प्रदेशात पाणी उपसणाऱ्या पंपाना, शीत कपाटे व रात्रीच्या वेळेस उजेडाकरिता सौर- पॅनेलच्या मार्फत वीजपुरवठा होतो.
सौर पथदीप (Solar Street Lamps): डोंगराळ व दुर्गम भागातील रस्त्यांवरच्या दिव्यांसाठी याचा पथदीप म्हणून वापर केला जातो, सूर्यास्त ते सूर्योदय यावर आपोआप चालू व बंद होणारी यंत्रणा यात असल्याने खूप उपयोगाची ठरते.
सौर कंदील (सोलर लॅटर्न्‍स)  (Solar Lanterns): लहान, सुटसुटीत अशी सौर प्रकाश प्रणाली जी आपण कोठेही घेऊन जाऊ शकतो. अंधाऱ्या वाटेवर, शेत, डोंगर भागात वापरण्यास जास्त उपयुक्त ठरते. २ ते ४ तासांपर्यंत सीएफएल (CFL) किंवा एलईडीचा (LED) पांढरा व स्वच्छ प्रकाश मिळतो. 
सौर घरगुती दीप (Solar Home Lamps): डोंगराळ, दुर्गम व ज्या भागात वीज पोहोचलेली नाही अशा भागात राहणाऱ्या कुटुंबाना रात्रीच्या वेळी उजेडाकरिता या प्रकारच्या छोट्या सयंत्राचा वापर केला जातो. यामध्ये १ दिव्यापासून ४ दिव्यांपर्यंत गरजेनुसार निवड केली जाते.
नुकतेचमहाराष्ट्र सरकारने 10 सप्टेंबर 2015 रोजी एक छतावरील "सौर फोटोव्होल्टाईक (Rooftop Solar) ऊर्जानिर्मिती यंत्रणा‘ याविषयी ऊर्जाविषयक धोरण प्रसिद्ध केले आहे. अत्यंत आकर्षक असे हे धोरण छतावरील "सौर फोटोव्होल्टाईक (Rooftop Solar) ऊर्जानिर्मिती यंत्रणा” वरदान ठरेल. कुणीही ग्राहक जो स्थानिक ऊर्जा वितरण कंपनीचा ग्राहक आहे, तो यात भाग घेऊ शकतो. व्यक्ती, संस्था, छोटा उद्योग, औद्योगिक कारखाना वा एखादी गृहरचना संस्था, हे सर्व जण त्यांच्या असलेल्या मंजूर क्षमतेची सौर "फोटोव्होल्टाईक ऊर्जा यंत्रणा‘ त्यांच्या मालकीच्या छतावर जागेत लावून त्यामधून निर्माण झालेली वीज स्वतःच्या वापरासाठी आणि जास्तीची शिल्लक ऊर्जा संबंधित वितरण कंपनीला देऊ शकतो. यासाठीची जी यंत्रणा बसविली जाते तिला नेट-मीटरिंग असे म्हणतात. या "नेट मीटरिंग‘चे मुख्य कार्य हे सौरऊर्जेवरील यंत्रणेद्वारे घेतलेली वीज आणि वितरण कंपनीकडून वापरण्यात आलेली वीज याचा तपशीलवार हिशेब ठेवण्यासाठी होते.
छतावरील सौर फोटोव्होल्टाईक ऊर्जा निर्मिती यंत्रणा प्रामुख्याने ३ प्रकारांत येतात.
1)    "ऑफ ग्रीड” यंत्रणा म्हणजे वीज नसतानाही चालविता येणारी यंत्रणा.
2)     "ऑन ग्रीड” यंत्रणा म्हणजे वीज आणि सौरऊर्जा यांच्या समन्वयाने चालणारी यंत्रणा.
3)     “ऑन ग्रीड विथ बॅटरीबॅकअप” यंत्रणा म्हणजे वीज नसताना ही आणि वीज असतानाही चालणारी यंत्रणा.
ऑफ ग्रीड म्हणजे वीज नसतानाही चालविता येणारी यंत्रणा.
या यंत्रणेमध्ये सौरऊर्जेच्या माध्यमातून तयार झालेली ऊर्जा बॅटरीमध्ये साठवून गरजेनुसार वापरता येते. यामध्ये दिवसभरातील लागणाऱ्या ऊर्जेचा वापरही बॅटरीद्वारेच होतो आणि शिल्लक ऊर्जा ही सुद्धा बॅटरीमध्येच साठविली जाते. वीज नसतानासुद्धा बॅटरीमध्ये साठविलेल्या ऊर्जेच्या माध्यमातून आपल्या विजेच्या गरजा भागविता येतात हा या यंत्रणेचा मोठा फायदा असतो. यामधील बॅटरीज या सौरऊर्जा उपलब्ध नसताना नित्याच्या विजेच्या साह्याने सुद्धा चार्ज करता येतात. यामध्ये वीज वितरण कंपनीला देता येणारी वीज ही वेगळ्या पद्धतीने घेतली जाते. कारण बॅटरीमध्ये साठवून ठेवलेली ऊर्जा ही नेट मीटरिंग पद्धतीने देता येत नाही. ही यंत्रणा तुलनेने थोडी महाग असते.
"ऑन ग्रीड’’ यंत्रणा म्हणजे वीज आणि सौरऊर्जा यांच्या समन्वयाने चालणारी यंत्रणा.
सौरऊर्जेवर तयार होणारी वीज आणि नेहमीची वीज एकत्रितपणे सलग वापरता येते आणि तिचा संयुक्त वापर थांबल्यावर तयार होणारी; पण न वापरली जाणारी शिल्लक ऊर्जा वितरण कंपनीला देण्याची प्रक्रिया चालू होते. यामध्ये नेहमीची वीज नसेल, तर मात्र आपल्या स्वतःच्या गरजा भागविण्यासाठी या ऊर्जेचे निर्माण होण्याची प्रक्रिया कामी येत नाही. एकंदर गरजांचे सुयोग्य मूल्यमापन करून योग्य क्षमतेची यंत्रणा आस्थापित करून घेतल्यास रात्री वापरल्या जाणाऱ्या ऊर्जेची आगाऊ निर्मिती दिवसा करून आणि ती वीज वितरण कंपनीला देऊन त्या दिलेल्या ऊर्जेच्या बदल्यात रात्री आपल्या गरजा भागविण्यासाठीवीजवापर करता येतो. कारण विजेच्या बदल्यात वीज हे समीकरणच आहे या नेट मीटरिंग यंत्रणेचे.
“ऑन ग्रीडविथबॅटरीबॅकअप” यंत्रणा म्हणजे वीज नसतानाही आणिवीज असतानाही चालणारी यंत्रणा.
ही यंत्रणा म्हणजे वरील दोन्ही यंत्रणांचा समन्वय. यामध्ये सौरऊर्जेवर तयार होत असलेल्या ऊर्जेतून लागणारी ऊर्जा वापरता येते. वापरत असताना यंत्रणेबरोबर आलेल्या बॅटरीमध्ये साठवता येते आणि त्यानंतर शिल्लक राहणारी ऊर्जा वीज वितरण कंपनीला देता येते.
अशा या दोन प्रकारच्या यंत्रणा नेट मीटरिंग पद्धतीची सुयोग्य सांगड घालून वापरता येतात. वीज वितरण कंपनीच्या याबाबतच्या अटी आणि शर्ती या प्रत्येक घटकासाठी वेगवेगळ्या आहेत आणि त्याबाबतचे स्पष्ट धोरण महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण (महाऊर्जा) या राज्य शासनाच्या संस्थेच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे. यामध्ये सौर उर्जेमार्फत निर्मित वीज यंत्रणेसाठी खासगी वापराकरिता केंद्र सरकारकडून अनुदानाची तरतूद केलेली आहे. राज्य शासनाच्या वतीनेही काही अनुदान पदरात पडेल अशी संकेतही व चर्चा सुरु आहेत असे समजत आहे. पण उद्योग आणि व्यावसायिक क्षेत्रासाठी अनुदानाची तरतूद नाही. या यंत्रणेसाठी गृह कर्जाशी संलग्न कमी दराचे कर्ज देण्याची तरतूद आहे.
सौर ऊर्जा वापरण्यास अत्यंत सोपी, कोणतेही प्रदूषण न करणारी, भरवशाची, मुबलक प्रमाणात वापरता येणारी, मोफत मिळणारी, घरांघरांवर विद्युत ऊर्जा, उष्णता ऊर्जा देणारी सौर ऊर्जा भारतासाठी अत्यंत महत्त्वाचा आणि शाश्वत असा नैसर्गिक अपारंपरिक स्रोत  आहे. सौर ऊर्जेबरोबर, पवन ऊर्जा, घन कचऱ्यापासून इंधन निर्मिती, समुद्री लाटांपासून वीजनिर्मिती करण्याचे प्रयोग देशभर सुरू असून त्यांच्या वापरामुळे देशातील प्रत्येक कुटुंबाला कळत-नकळत फायदा होणार आहे.
अपारंपरिक ऊर्जेचा वापर करण्यावर मोठया प्रमाणात प्रयत्न सुरू झाले आहेत. रस्त्यारस्त्यावर सौर दिव्यांची यंत्रणा बसवून खेडेगावांपर्यत प्रकाश पोहोचवण्याचे प्रयत्न देशपातळीवर सुरू आहेत. विजेचा पुरवठा अखंड सुरू राहण्याकरिता आणि ग्राहकांची मागणी पूर्ण करण्याकरिता सौर ऊर्जेचे, पवनऊर्जेचे प्रकल्प महाराष्ट्रात आणि इतर राज्यात उभारले जात आहेत.
वापरण्यास अत्यंत सोपी, कोणतेही प्रदूषण न करणारी, भरवशाची, मुबलक प्रमाणात वापरता येणारी, मोफत मिळणारी, घरांघरांवर विद्युत ऊर्जा, उष्णता ऊर्जा देणारी सौर ऊर्जा भारतासाठी अत्यंत महत्त्वाचा आणि शाश्वत असा नैसर्गिक अपारंपरिक स्रोत  आहे.
सौर ऊर्जेबरोबर पवन ऊर्जा, घन कचऱ्यापासून इंधन निर्मिती, समुद्री लाटांपासून वीजनिर्मिती करण्याचे प्रयोग देशभर सुरू असून त्यांच्या वापरामुळे देशातील प्रत्येक कुटुंबाला कळत-नकळत फायदा होणार आहे. आपल्याला आणि आपल्या भावी पिढीला हा फायदा व्हावा असे जर वाटत असेल, तर स्वत:पासून त्याची सुरुवात झाली पाहिजे.

https://amzn.to/2Ryg8wg


३) सौरचूल किंवा सौरकूकर
सोलर कुकर, सौर वीज यंत्रणा, सौरबंब, सोलर ड्रायर इ. चा वापर करणे म्हणजेच भावी पिढीची सोय करण्यासारखे आहे. सोलर कुकरमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थ शिजतात. महाराष्ट्रात सर्वत्र सोलर कुकरमध्ये अन्न शिजते. महाराष्ट्रातील किमान ५०% कुटुंबे आपापल्या घरी सोलर कुकरचा वापर करू शकतात. याकरिता फक्त मानसिकता बदलणे गरजेचे आहे. आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीत प्रत्येक जण संतुलित आणि पोषक आहाराच्या मागे लागलेला आहे. सूर्यचुलीत तयार झालेल्या अन्नामध्ये जीवनसत्त्व जसेच्या तसे राहत असल्याने अन्नाची चव अतिशय उत्तम लागते. यातून अनेक व्याधी दूर होत असल्याने अनेक वैद्य सौर ऊर्जेवर शिजलेले अन्न खायचे सुचवतात. सुमारे ३०० दिवस कार्यान्वित राहू शकणारा सोलर कुकर एका वर्षातच त्याची किंमत वसूल करून देतो. आपण सकाळी आणि संध्याकाळी काय जेवणार आहोत याचे नियोजन केल्यास दोन वेळचे अन्न आपण त्यावर शिजवू शकतो. उन्हाळयात ९०-१००से, तर हिवाळयात ८५-१०० से.पर्यंत तापमान सूर्यचुलीवर निर्माण होते. त्या तापमानाला दीड ते दोन तासात अन्न शिजून तयार होते. तापमान कमी असल्याने अन्न हळुवार शिजते. त्यामुळे अन्न करपण्याची अथवा जळण्याची शक्यता सूर्यचुलीत नसते. माउंट अबू, तिरुपती बालाजी, शिर्डीचे साईबाबा देवस्थान या ठिकाणी सुमारे ४०-५० हजार भाविकांचा स्वयंपाक सौर ऊर्जेवर होतो. तसेच बिहार, उत्तर प्रदेश या ठिकाणी सोसायटयांमध्ये कम्युनिटी सोलर कुकरचा वापर केला जातो, जेणेकरून संध्याकाळी कामावरून आल्यानंतर या कुकरमध्ये तयार झालेल्या अन्नाचे डबे घरी घेऊन जाता येतात. असेच सोलर कुकर महाराष्ट्रातही सरकारी व खाजगी कार्यालयांत किंवा रहिवासी सोसायटयांमध्ये लावले गेल्यास अब्जावधी रुपयांचे इंधन वाचू शकेल, शिवाय मोठया प्रमाणावर कार्बन डायऑक्साईडची निर्मिती थांबून पर्यावरणाची हानी टळू शकेल.
ह्या कुकरमध्ये रवा व शेंगदाणे उत्तम भाजले जातात व वरण-भात,सर्व प्रकारच्या भाज्या, बटाटे उत्तम शिजते. बाकी मेंटेनन्स शून्य, फक्त रोजच्या रोज एकदा काच स्वच्छ करावी लागते. सोलर वॉटर हिटर प्रमाणेच या कुकरलाही मुबलक स्वच्छ सूर्य प्रकाश असणे गरजेचे आहे. म्हणजेच पावसाळ्यात जेंव्हा आकाश ढगाळ असते व जेंव्हा सूर्यप्रकाश पुरेसा नसतो त्यावेळी हा कुकर अन्न शिजवण्यासाठी वापरता येत नाही.
पावसाळयात सूर्यचूल चालत नाही, वीजनिर्मिती होत नाही, अन्न तयार होण्यास खूप वेळ लागतो, चपाती-भाकरी होत नाही, रात्री वापरता येत नाही, उपकरण महाग आहेत, देखभाल कशी करणार?.. मग सौर ऊर्जेवरील उपकरणे वापरायचीच नाही का? याचा विचार सर्वांगाने होणे आवश्यक आहे. भारतात पावसाळा चार महिने समजला जातो, तो खरोखरच १२० दिवस पडतो का? पाऊस जेमतेम ३५-४० दिवसांवर येऊन ठेपला आहे. म्हणजे ६५ दिवस सोडून दिले, तरी ३०० दिवस उत्तम प्रकारे या सर्व उपकरणांचा वापर करता येतो. चपाती-भाकरी भाजता येत नाही, हे बरोबर आहे. पण आपल्या आहाराचा विचार करता आपल्या ताटात डाळ, भात, भाजी आणि चपाती किंवा भाकरी असे पदार्थ असतात. यातील तीन पदार्थ शिजणारे आहेत, तर एक भाजण्याचा - म्हणजे जर ७५% अन्न तयार होत असेल, तर २५%चा विचार का करायचा? जे मिळत आहे, ते प्रथम स्वीकारायला तर शिका.. कारण चपाती-भाकरी भाजणे यालाही पर्याय आहेत. त्यासाठी जागा आणि पैसे खर्च करण्याची तयारी ठेवल्यास तेही शक्य होऊ शकते. राहिले ते वेळेचे गणित. १९९२ साली अन्न शिजवण्याचे काही प्रयोग करण्यात आले. त्या वेळी तुरीची डाळ, बटाटे शिजण्याकरिता अडीच ते तीन तास लागत असायचे. सद्य परिस्थितीत मात्र हे शिजायला जेमतेम दीड तास पुरेसा होतो. यामागील कारण म्हणजे संपूर्ण विश्वाचे एक ते दीड अंश सेल्सिअसने वाढलेले तापमान होय.
वीज असूनही अंधार
आज देशात ज्या घरांपर्यत वीज पोहोचली आहे, अशा घरांतही अंधार बघावयास मिळतो, ही अत्यंत खेदकारक गोष्ट आहे. आपला देश समृध्दीकडे जात असताना घरगुती वापरासाठीच्या विजेची पूर्तता आपण करू शकत नाही, म्हणजे कुठेतरी गणित चुकत आहे, असे समजले पाहिजे. त्याविषयी आपण प्रत्येकाने जाणून घेणे महत्त्वाचे आहे. मुख्यतः त्यासाठी मोठया प्रमाणावर - म्हणजेच सुमारे ५०% औष्णिक वीज कोळशाचा वापर करून तयार होते आणि ५०% इतर स्रोतांपासून वीज निर्माण केली जाते. यातील सर्वात खर्चीक, प्रदूषण निर्माण करणारी वीज म्हणजे औष्णिक वीज. १ युनिट वीजनिर्मितीसाठी ८०० ग्रॅम कोळशाचा आणि १० लीटर पाण्याचा वापर केला जातो. शिवाय ज्या ठिकाणी वीजनिर्मिती होते, तेथून ग्राहकापर्यंत पोहोचताना प्रवाहाच्या रोधामुळे 33% वीज खर्च होते, हा यामधील मोठा तोटा आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे सन २०४०-५० च्या दरम्यान कोळशाचे साठे संपुष्टात येतील, असे तज्ज्ञांचे मत आहे. वरील सर्व आकडेवारी पाहता औष्णिक वीज परवडणारी नसून फक्त सरकारी अनुदानामुळे आपल्याला स्वस्त मिळत आहे, हे विसरून चालणार नाही.
समाजातील समज-गैरसमज आणि अपेक्षा
आता प्रश्न राहिला तो उपकरण महाग असल्याचा. जितक्या मोठया प्रमाणात या सर्व उपकरणांचा वापर वाढेल, तशा याच्या किंमतीही कमी होतील. सुरुवातीचा मोबाईल अतिसामान्य माणसाला परवडणारा नव्हताच; पण जसा त्याचा वापर वाढला, कॉल कॉस्ट कमी झाली, तशा मोबाइलच्या किमतीही कमी झाल्या. आज सोलर सेलच्या बाबतीतही तसेच झाले आहे. दहा वर्षांपूर्वी ४०० रु. प्रतिवॉट असा असलेला खर्च आज १०० ते १८० रु. प्रतिवॉटच्या दरम्यान खाली आलेला आहे. आता राहिला तो अनुदानाचा प्रश्न. गेल्या वर्षापर्यंत सोलर वॉटर हीटर यंत्रणेवर अनुदान मिळत होते, पण आता ते बंद झालेले आहे. सौर वीज यंत्रणेबाबत अतिदुर्गम भागाकरिता अनुदान दिले जाते. अनुदान म्हणून नाही, पण कमी व्याजदराने राष्ट्रीयीकृत बँका यासाठी कर्ज देतात. त्यासाठी बँकांच्या गरजेनुरूप कागदपत्रांची पूर्तता करावी लागते. याउलट विचार करता असे लक्षात येते की जितका वापर लवकर सुरू होईल, तितकाच लवकर खर्च वसूल होऊन मोफत सेवा मिळू लागेल, हेच आपले अनुदान समजू या आणि अपारंपरिक, कधीही न संपणारी, मोफत मिळणारी सौर ऊर्जा वापरायचा निश्चय करू या.
सौर ऊर्जा अभ्यासक आणि मार्गदर्शक
श्री. सौरभ लक्ष्मण कुंभार.
व्यवस्थापक -विपणन, सुरभि सिस्टम्स
ऑफिस क्र. १, १८/२०, उष:काल हाउसिंग सोसायटी, तरवडेवस्ती. महंमदवाडी, पुणे – ४११०६०
महंमदवाडी पोलीस चौकी समोर फोन. ०२० २६९७०९६४  मोबा: ९८६०००००४५
अधिक माहितीसाठी आपण खाली दिलेल्या इ-मेलवर आपल्या शंका व कुणाला सौर यंत्रणा बसविण्यास  इस्छुक असाल तर आपल्या प्रतिक्रिया पाठवू शकता. 
sales@surbhisystems.in आणि saurabhkumbhar@gmail.com   
blog:www.saurabhkumbhar.blogspot.com
कृपया खालिल संकेतस्थळावर भेट द्या.
www.surbhisystems.in

Monday, January 4, 2016

विविध जिल्हातून वर्तमान पत्रातून आलेल्या बातम्या

विविध जिल्हातून वर्तमान पत्रातून आलेल्या बातम्या  


माझा प्रवास - सौरऊर्जेचा प्रसार आणि प्रचार

माझा प्रवास 
       उपक्रम पूर्ण करण्याच्या नादात दैंनदिन प्रवास करताना आलेले अनुभव जे पहिले, जे वाटले त्याचे साध्या सुध्या शब्दात केलेले वर्णन करीत आहे, त्यात अलंकारिक भाषा नाही, सोबत असलेल्या व मदत केलेल्या मंडळींचा उल्लेख अतिशय थोडक्या शब्दात मांडत आहे.

       अपुऱ्या वि‍जेच्या संकटापासून वाचण्यासाठी जग भर चालू असलेल्या चळवळीत, पर्यावरणास पूरक अशा साधन संपत्तीचा जास्तीत जास्त वापर करून हातभार लागावा, विजेची बचत व काही प्रमाणात निर्मिती व्हावी या उद्देशानेच अपारंपारिक ऊर्जा स्त्रोत म्हणून ओळख असलेल्या सौर ऊर्जाचा वापर शासकीय कार्यालयात करावा यासाठी प्रचार व प्रसार करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे राज्यातील सर्व जिल्हा मुख्यालयांस माझ्या रॉयल एम्फिल्ड बुलेट क्लासिक ३५० या मोटारसायकलवरून भेट देऊन शासकीय कार्यालय आणि त्याच्या संलग्न संस्थेत सौरऊर्जेचा वापर व्हावा यासाठी प्रसार आणि प्रचाराचे काम करायचे, असा निर्णय मी ऑक्टोबर महिन्यात घेतला होता.

      मोटार सायकलीवरून जायचे तर सोबत कुणाचीतरी हवी म्हणून मी संतोष विचारले, तो लगेच हो म्हणाला, मी लगेच नियोजनाला लागलो, पूर्वी नोकरीच्या निमित्ताने महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हात काम करण्याचा आणि पूर्ण महाराष्ट्र फिरण्याचा अनुभव माझ्याकडे होताच. प्रत्येक जिल्हा स्तरावर पुष्कळ मित्रपरिवार असल्याने मला नियोजन करण्यात बिलकुल अडचण वाटत नव्हती. प्रवासाचे नियोजन हिवाळ्यात करायचे असे मी ठरवले. सुरवातीला प्रवास प्रारंभाचा दिवस ठरला होता ३० नोव्हेंबर, कारण त्यादिवशी सोमवार होता त्यामुळे आठवड्याचे नियोजन आम्हाला करता येईल असे वाटले, पण नियोजन करताना माझ्या मुलीचा वाढदिवस ३० नोव्हेंबरला आहे, हे विसरलो होतो, पण पत्नीने आठवून दिल्याने मी माझ्या उपक्रमाची सुरुवात १ डिसेंबरला करू असे ठरविले.

मूळ अडचण होती मला कामावरून एक महिन्याची सुट्टीची मिळेल? का नाही? याची पण मी सुट्टी मागितली व कार्यालयाने मला माझी रजा मंजूरही केली, या उपक्रमास माझ्या संपुर्ण कुटुंबाकडुनही प्रोत्साहन मिळत होते. माझे आई, वडिल, भाऊ, बहिण, पत्नी विशाखा, माझ्या मुली सुरभि आणि स्वानंदि यांनी माझ्या या उपक्रमास पाठिंबा दिला. सर्व काही यथासांग जुळून आले होते. 
निघण्याची तारीख अंतिम करण्यात आली होती, नियोजन कसे करायचे मार्गक्रम कसा असेल याचा अभ्यास करायला लागलो. पूर्ण अनेक वेळा महाराष्ट्र फिरण्याचा अनुभव होताच त्यामुळे शासकीय सुट्ट्या, जिल्हा स्तरावरील मित्रांची उपलब्धता, गुगल मॅप, नकाशांचा अभ्यास करुन करुन मी प्रवासाचा मार्गक्रम ठरविला. 

१ तारखेला पुण्यातून निघून सातारा जिल्ह्यातून सुरुवात करायची असे ठरवले. 

१ डिसेंबर रोजी सातारा व सांगली, २ डिसेंबरला कोल्हापूर, सिंधुदुर्ग, ३ डिसेंबरला रत्नागिरी, ४ डिसेंबरला अलिबाग, ठाणे, ५ डिसेंबरला पालघर, नाशिक, ७ डिसेंबरला धुळे, नंदुरबार, ८ डिसेंबरला जळगाव, ९ डिसेंबरला बुलढाणा व अकोला, १० डिसेंबर अमरावती, वर्धा, ११ डिसेंबर नागपूर व भंडारा, १४ डिसेंबर गोंदिया व गडचिरोली,१५ डिसेंबर चंद्रपूर, १६ डिसेंबर यवतमाळ व वाशीम, १७ डिसेंबर हिंगोली, १८ डिसेंबर नांदेड, १९ डिसेंबर लातूर व उस्मानाबाद, २१ डिसेंबर सोलापूर, २२ डिसेंबर बीड व परभणी, २३ डिसेंबर जालना, २८ डिसेंबर औरंगाबाद व अहमदनगर,३० डिसेंबरला आमच्या मोहिमेची सांगता पुणे जिल्हा मुख्यालयास भेट देऊन करण्याचे नियोजन केले. साधारणतः एकूण ५५०० किलोमीटर प्रवास होईल असा अंदाज बांधला गेला.
नियोजन वेळेत पूर्ण होईल का? हे शक्य नाही? अशा उपक्रमातून काहीही साध्य होणार नाही! अनावश्यक खटाटोप आहे! जिल्हांना खरंच भेटी देणार का? यापूर्वी आम्ही असे प्रयोग केले होते पण काहीही फायदा झाला नाही, असे अनेक शंका/प्रश्न उपस्थित करणारे मला अप्रत्यक्ष प्रोत्साहन देत होते.
नियोजन पूर्ण झाले, Facebook, Whats app, Blog सारख्या सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून सदर उपक्रमाचे वेळेसहित नियोजन प्रसिद्धी केले. जिल्हा स्तरावरील मित्र परिवाराला फोन करुन नियोजनाची माहिती दिली व जिल्हास्तरावर आम्हाला सहकार्य करण्याचे आवाहन केले.  

          एकूण ५५०० किलोमीटर प्रवास, ३४ जिल्हा मुख्यालयास भेटी, लोकांशी प्रत्यक्ष, भेटीगाठी घेऊन स्थानिक पातळीवर आघाडीवर असलेले दैनिक वृत्तपत्र/आवृत्ती यामध्ये सौर ऊर्जेचा वापर करणेबाबत व माझ्या उपक्रमाबद्दल प्रसिद्धी देऊन जनजागृती करण्याचा संकल्प नियोजनात केला होता. काही उत्तम विधायक व समाजोपयोगी कार्याचे सर्व स्तरावरून कौतुक होत होते. पेपरमध्ये बातम्या छापून यायला लागल्या होत्या त्यामुळे आम्ही उत्साहात होतो. असा समाजोपयोगी काम करुन आपण काहीतरी भन्नाट करत आहोत याची जाणीव होत होती.
कसं होईल? काय होईल? शासकीय कार्यालयातून प्रतिसाद कसा मिळेल? ही धास्ती मनामध्ये होतीच पण जिद्द केली होती की, काहीही झाले तरी हा उपक्रम पूर्ण करायचाच. 

प्रवासाचे नियोजन, प्रसिद्धी झाली होती, माझ्याकडून जिल्हास्तरावरील माझ्या मित्रांचे त्या त्या जिल्हात नियोजन झाल्याचे समजत होते, राज्यात वर्तमान पत्रात बातम्या प्रसिद्ध व्हायला लागल्या होत्या, अपेक्षांच ओझं वाढत चालल होत, त्याच मनावर प्रचंड दडपण येत होत. 

      आता तयारी करायची होती बॅग भरायची, अगोदरच आम्ही पुण्यातून बुलेटला साजेल अशी मिलिटरी टायपची बॅग घेतली होती. ती बॅग मागील शीटवर व्यवस्थित फीट होते, आणि मागील व्यक्तीला बसायलाही त्रास होत नाही, बॅगेत काय काय घ्यायचे याची यादी तयार करुन १५ दिवसांपासूनच साहित्यांची जमवाजमव सुरु केली होती, एकंदरीत प्रवासा दरम्यान सुट्टी केंव्हा येणार आहे?, केंव्हा आपल्याला कपडे धुता येणार आहे?, त्या दृष्टीने कपडे घ्यायचे, अंघोळीचे साबण, कपड्याचा साबण व इतर आवश्यक बाबी.        

      प्रवासात कोणत्या गोष्टी करायच्या, करायच्या नाही काय सावधगिरी बाळगायची याची नियमावलीच मी तयार केली होती, जसे की हेल्मेट, जर्किन, गॉगल घातल्याशिवाय गाडी चालवायची नाही, गाडीचा स्पीड जास्तीस जास्त ताशी ८० ते ९० किलोमीटर वर काटा जाऊन द्यायचा नाही, सकाळीच नाष्टा करुन प्रवासास सुरुवात करायची, पिण्याला अति थंड पाणी टाळायचे, शक्यतो बंद बाटलीतले पाणी प्यायचे, प्रवासात मांसाहार वर्ज करायचा जेवण शक्यतो कामी व हलकेच करायचे, गाडीवर असताना मोबाईलवर बोलणे टाळणे, साधारणतः ८० ते १०० किलोमीटर अंतर पार केल्यानंतर थोडावेळ थांबून चहा घेऊन पुन्हा मार्गस्थ व्हायचे, शक्यतो उजेड असे पर्यंतच गाडी चालवायची अंधार पडायला लागला, की जवळ असलेल्या तालुका स्तरावर अरामाकरिता निवारा शोधायचा आणि मुक्काम करायचा, रोज सकाळी व संध्याकाळी घरी फोन करुन प्रवासाची व सुखरूप असल्याची वार्ता द्यायची, दिवस भराचा झालेला खर्च लिहून काढणे ई.

(दि.१, मंगळवार) १ डिसेंबरला सकाळी ८ वाजता प्रवासास सुरुवात केली साधारणतः ११ वाजता आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय, सातारा येथे पोहचलो. जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांची भेट घेऊन त्यांच्याकडे निवेदन सादर केले. दुपारी २ वाजता साताऱ्यातून आम्ही सांगलीकडे रवाना झालो, ५.३०  वाजता सांगलीत जिल्हाअधिकाऱ्यांची भेट घेतली व मुक्काम सांगलीमध्ये करायचे ठरवले. आज दिवसभरात आम्ही सातारा आणि सांगलीच्या जिल्हाधिकार्यांाना भेटून निवेदन दिले होते प्रत्यक्ष भेटही झाली होती, त्यांना सौरऊर्जेचे महत्त्व समजून सांगण्याचा प्रयत्न केला त्यांच्या जिल्हातील ज्या ग्रामपंचायती सधन आहेत. ज्या गावांचे उत्पन्न १० लाखांच्या पुढे आहे, अशा ग्रामपंचायतींना सौर ऊर्जेचा वापर करणे शक्य आहे का?. याची माहिती घेण्यास सुरुवात केली. पहिल्याच भेटीत खूपच चांगला प्रतिसाद मिळाला. त्यामुळे आपण करीत असलेल्या उपक्रमाला उत्तम प्रतिसाद मिळत आहे, हे पाहून आमच्या उत्साहाला पारावार उरला नाही. पहिल्याच दिवशी आमचा २७५ किलोमीटर प्रवास झाला होता. 

(दि.२, बुधवार) सांगलीतून सकाळी ८ वाजता नाष्टा करुन कोल्हापूरकडे रवाना झालो, कोल्हापूरमध्ये अधिकाऱ्यांशी भेट घेऊन आम्ही दुपारी १ वाजता सिंधुदुर्गच्या बाजूने कुच केली, आंबोली घाटातून जाताना निसर्ग सौंदर्य पाहत पाहत सायंकाळी ५ वाजता ओरसला पोहचलो, कार्यालये बंद होण्याच्या बेतातच होती, धावत पळत जिल्हाधिकारी व जिल्हापरिषद कार्यालयास भेट देऊन ओरसला मुक्काम करायचं ठरवलं. ओरसमध्येच  भक्तीनिवास मध्ये थांबलो. या दिवशी आमचा २२० किलोमीटर प्रवास झाला होता.

(दि.३, गुरुवार) तिसऱ्या दिवशी पहाटे लवकर उरकून ७ वाजताच आम्ही रत्नगिरीच्या बाजूनी निघालो, वाटेतच कुडाळ मध्ये चहा नाष्टा केला आणि पुढे निघालो, आडिवरे पावस मार्गे साधारणतः २०० किलोमीटरचा प्रवास करुन आम्ही रत्नागिरीला साधारणतः दुपारी १२ वाजता पोहचलो. मुंबई गोवा महामार्ग सोडल्यावर आडिवरे पावस मार्गे जाताना रस्त्याचे चढ उतार, भयाण शांतता आमच्याशिवाय एकही गाडी दिसत नव्हती, रस्तातर चुकलो नाही ना? हे विचारायला मानस पण दिसत नव्हती.  कसं तरी आडिवरे मध्ये आल्यावर स्थानिक लोकांकडून पुढच्या रस्त्याचा मार्ग समजून घेतला, कोकणातली रस्ते नागमोडी, छोटे छोटे घाट, समुद्र किनाऱ्यावरून जाताना, आंब्याच्या वनातून जाताना आम्ही थोडा निवांतपणा म्हणून फोटो काढले. रत्नागिरीत अधिकाऱ्यांशी व पत्रकारांशी भेटून आम्ही दुपारी ३ वाजता अलिबागच्या बाजूने मार्गस्थ झालो. अलिबाग आणि रत्नागिरी अंतर जास्त होते म्हणून आम्ही रस्त्यातच तालुकाच्या ठिकाणी मुक्काम करायचे ठरवले खेडला किंवा महाडला मुक्काम करू असे ठरले, पण रात्री ८ वाजले होते आणि आम्ही महाडला थांबणार, तोच बायपास मार्गे महाड केंव्हा मागे गेलं समजलंच नाही, डोळ्यांवर समोरच्या गाड्यांचे हेडलाईट चमकत होते, डोळ्यांवर प्रचंड ताण आला होता. प्रवास प्रचंड झाला होता, आज शेवट माणगावला मुक्काम केला. साधारण रत्नागिरी ते माणगाव १५० किलोमीटरचा प्रवास करुन माणगावला हॉटेल मध्ये शांत झोपलो. 

(दि.४, शुक्रवार) चौथ्या दिवशी सकाळी ८ वाजता उरकून मुरुड मार्गे अलिबागच्या बाजूने प्रस्थान केले. ८० किलोमीटर प्रवास केल्यानंतर सकाळी १० वाजता रायगड जिल्हाचे मुख्यालय असलेल्या अलिबाग या शहरात पोहचलो, शासकीय अधिकारी उपलब्द नसल्यामुळे फक्त निवेदन कार्यालयात जमा करुन ११ वाजता ठाण्याकडे निघालो १०० किलोमीटर प्रवास झाल्यानंतर दुपारी २ वाजता ठाण्यात पोहचलो, तासाभरात काम उरकून पालघरच्या दिशेने रवाना झालो. ६ वाजता पालघरला पोहचलो कार्यालये बंद होण्याच्या स्थितीत होती तश्याचे निवेदने जमा केली आणि मुक्काम कोठे करायच्या या विवंचनेत होतो, शेवट संतोष आणि मी चर्चाकरून नाशिकला जाऊन मुक्काम करायचे ठरवले अंतर खूप होते कारण ३५०-३७५ किलोमीटर अगोदरच प्रवास झाला होता. साधारण १६० किलोमीटर अंतर पार करायचा निर्णय आम्ही घेतला आणि नाशिक मध्ये मित्रांना फोन करुन हॉटेल बुक करायला सांगितले, हॉटेल तर बुक झाले होते त्यामुळे नाशिकलाच जावे लागणार होते.  त्यादिवशी आमचे सर्वाधिक प्रवास झाला ५०० ते ५५० किलोमीटर प्रवास करुन आम्ही रात्री ११.३० ला नाशिक मध्ये दाखल झालो, पाय प्रचंड दुखायला लागले होते. जेवण करुन झोप केंव्हा लागली काही समजलेच नाही. आज दिवसभर आम्ही साधारणपणे ५०० किलोमीटर प्रवास झाल्याने बसल्या जागी आम्ही मागे पुढे होत होतो अस वाटत होत, जस की, आम्ही गाडीवरच बसलो आहे.

(दि.५, शनिवार) पाचव्या दिवशी नाशिकमध्ये १०.०० वाजता उरकून बरोबर सकाळीच १०.३० ला मी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन सादर केले आणि जिल्हा परिषदेत आवक विभागात त्यांचे निवेदन जमा केले. पत्रकारांशी चर्चा करुन १२ वाजता धुळ्याकडे प्रस्थान केले. राष्ट्रीय महामार्ग ३ असल्यामुळे आम्ही धुळ्याला अक्षरशः १६० किलोमीटरचे अंतर २.१५ तासात पार केले. धुळे जिल्हाधिकाऱ्यांशी भेट घेऊन मी नंदुरबारला प्रस्थान केले ११० किलोमीटर प्रवास करुन संध्याकाळी ६ वाजता पोहचून निवेदन शासकीय कार्यालयात जमा केले आणि मुक्काम नंदुरबार मध्येचं केला. आज दिवसभर आम्ही साधारणपणे २६० किलोमीटर प्रवास झाला.

(दि.६ रविवार) सहाव्या दिवशी रविवार असल्यामुळे निवांत ११.०० वाजता उठून दोनडायचा, सिंदखेडा अमळनेर, धरणगाव मार्गे जळगावकडे प्रस्थान केले. सायंकाळी ४ वाजेपर्यंत पोहचलो आणि आराम केला. आज दिवसभर आम्ही साधारणपणे १५० किलोमीटर प्रवास झाला.

(दि.७, सोमवार) सातव्या दिवशी १०.०० जिल्हाधिकारी कार्यालयकडे गेलो लोकशाही दिन असल्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयात खूप गर्दी होती, बऱ्याच वेळानंतर आमची प्रतीक्षा संपली आणि मा. जिल्हाधिकारी यांची भेट होऊन निवेदन सादर केले. इकडे श्री. अरुण कोष्टी यांनी प्रेस कॉन्फरन्स बोलाविली होती, स्थानिक नगरसेवकांना बोलवुन माझा सत्कार करण्याचे आयोजिले होते. छोटेखानी सत्कार व पत्रकारांना मी करीत असलेल्या उपक्रमाबद्दल व त्यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देऊन आम्ही जिल्हा परिषदेकडे जाऊन निवेदन सादर केले. अरुणनी जळगावचे लोकप्रिय वांग्याचे भरीत व भाकरीची शिदोरी दिली वा आम्ही आमच्या पुढील वाटचालीस सुरुवात केली सर्व कार्यक्रम होता होता जळगाव सोडायला दुपारी ४ वाजले तिथून आम्ही बुलढाण्याकडे मार्गस्थ झालो. भुसावळ, मलकापूर मार्गे सायंकाळी ८ वाजता बुलढाण्यात पोहचलो हॉटेलमध्ये जाऊन विश्राम केला. आज दिवसभर आम्ही साधारणपणे १७० किलोमीटर प्रवास झाला.

(दि.८, मंगळवार) आठव्या दिवशी सकाळी बुलढाणा जिल्हाधिकारी व जिल्हापरिषदेमध्ये निवेदन सादर केले, दुपारी १२ वाजता बोथा जंगलातून खामगाव मार्गे अकोल्याकडे निघालो, जंगलातून जाताना प्राण्यांपासून सावध राहा असे फलक दिसत होते, अक्षरशः रस्त्यावर कोणीच नव्हते, रस्ता चांगला होता, क्वचितच जंगल कर्मचारी दिसायचे, हा रस्ता रात्री ९ वाजता बंद केला जातो आणि सकाळी ७ वाजता उघडतो, कारण रात्रीच्या वेळी रस्तावरून प्राण्यांची येजा चालू असते, जंगल सुरु झाले तेंव्हा गाडी रिझर्व्हला आली होती आणि पेट्रोल पंप साधारणतः ४० किलोमीटर खामगावला होते. भीती मनात होती की, पेट्रोल संपल्यावर काय करायचे? साधारणतः १० किलोमीटर पुढे गेल्यावर विचार मनात आला गाडी आम्ही पुन्हा बुलढाण्याच्या बाजूने फिरवली, जंगलाच्या चेक पोस्ट वर आल्यावर तिथे पेट्रोल पंप बद्दल विचारणा केली, सुदैवानं सुटे पेट्रोल एका हॉटेलमध्ये मिळत असल्याचे आम्हाला समजले, सुरुवातीस आम्हाला पेट्रोल देण्यास नकार देण्यात आला पण आम्ही समजून सांगितल्यावर जास्त दराने १ लिटर पेट्रोल गाडीत ढकलले आणि आम्ही पुन्हा मार्गस्थ झालो आणि खामगावला येऊन पेट्रोल भरले. बुलढाणा अकोला साधारणपणे ११० किलोमीटर अंतर आहे, ४ वाजता अकोल्याला पोहचलो, अकोल्याला पोहचल्यानंतर जिल्हाधिकारी व जिल्हापरिषदेमध्ये निवेदन सादर केले, पत्रकारांशी चर्चा केली आणि मुक्कामी मुर्तिजापूर मार्गे १०० किलोमिटर अमरावतीकडे रवाना झालो. अमरावतीमध्ये हॉटेल मध्ये आराम केला. आज दिवसभर आम्ही साधारणपणे २३० किलोमीटर प्रवास केला.   

(दि.९, बुधवार) नवव्या दिवशी सकाळी १०.३० ला मा. जिल्हाधिकारी, अमरावती यांना भेटून त्यांच्याकडे निवेदन सादर केले.  तसेच जिल्हापरिषदेमध्ये निवेदन सादर केले, १२ वाजता अमरावती शहर सोडून आम्ही चांदूर रेल्वे, पुलगाव मार्गे १०० किलोमीटर वर्ध्याकडे निघालो. वर्ध्यामध्ये दुपारी ३ वाजता पोहोचलो जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा परिषदेमध्ये निवेदन सादर करुन आम्ही ६ वाजता मुक्कामी ८० किलोमीटर नागपूरच्या दिशेने रवाना झालो. नागपूरला जाऊन तिथे मुक्काम केला. आज दिवसभर आम्ही साधारणपणे २०० किलोमीटर प्रवास झाला.

(दि.१०,गुरुवार) दहाव्या दिवशी सकाळी १०.३० ला मा. जिल्हाधिकारी, नागपूर यांना भेटून त्यांच्याकडे निवेदन सादर केले.  तसेच जिल्हापरिषदेमध्ये मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, यांचेकडे निवेदन सादर केले, दुपारी १ वाजता नागपूर शहर सोडून आम्ही ७० किलोमीटर भंडाऱ्याकडे निघालो. रस्ता चांगला असल्यामुळे आम्ही दुपारी २.३० वाजता भंडाऱ्यात पोहोचलो जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा परिषदेमध्ये निवेदन सादर करुन आम्ही ५ वाजता मुक्कामी १०० किलोमीटर भंडाऱ्यातून गोंदियाच्या दिशेने रवाना झालो. आज दिवसभर आम्ही साधारणपणे १८० किलोमीटर प्रवास केला. गोंदियाच्या जवळच तिरोड्याला जाऊन तिथे मुक्काम केला.

(दि.११, शुक्रवार) अकराव्या दिवशी सकाळी ८ वाजता उरकून गोंदियाकडे प्रस्थान केले. नाष्टा करुन गोंदिया शहरात पोहचलो, तसेच मा. जिल्हाधिकारी व जिल्हापरिषदेमध्ये मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, यांचेकडे निवेदन सादर केले, दुपारी १ वाजता गोंदिया शहर सोडून आम्ही सडक अर्जुनी, नवेगाव बांध, अर्जुनी मोरगाव, देसाईगंज वडसा, आरमोरी मार्गाने साधारणतः १८० किलोमीटर गडचिरोलीकडे निघालो. रस्ता चांगला असल्यामुळे आम्ही सायंकाळी ५.३० गडचिरोलीला पोहोचलो मा. जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. तसेच जिल्हा परिषदेमध्ये निवेदन सादर करुन गडचिरोलीमध्ये मुक्काम करायचे ठरविले. आज दिवसभर आम्ही साधारणपणे २५० किलोमीटर प्रवास केला.

(दि.१२, शनिवार) बाराव्या दिवशी आज महिन्याचा दुसरा शनिवार असल्याने शासकीय सुट्टी असते म्हणून आम्ही आज आराम करायचे ठरविले. गेल्या १०,१२ दिवसांमध्ये केलेल्या धावपळीची उजळणी करायला लागलो, आणि मी माझी डायरी काढली आणि आणि प्रवास थोडक्यात लिहून काढला, नियोजनानुसार आम्ही एक दिवस अगोदर चाललो होतो. आज आम्ही गडचिरोली धरून २० जिल्ह्यात भेटी दिल्या होत्या, जिल्हास्तरावरून शासकीय अधिकाऱ्यांकडून मिळणारा सकारात्मक प्रतिसाद, जागोजागी मित्रांनी केलेली सोय, आम्ही पोहोचण्याच्या अगोदरच शहर सुरु होण्यापूर्वीच मित्र येऊन थांबलेले असत त्यामुळे जिल्हाधिकारी व जिल्हापरिषद शोधायला आमचा वेळ गेला नाही. मी यापूर्वी राज्यातील सर्व जिल्हा मुख्यालय कार्यालयांना पाच ते सहा वेळा भेटी दिल्या असल्याने बऱ्यापैकी शहरातील अंतर्गत रस्त्याची माहिती मला होती. विचार करता करता आम्ही राज्यातील २० जिल्ह्यांना भेटी दिल्या या विचारानाच मला खूप हायसं वाटलं होत.

(दि.१३, रविवार) तेराव्या दिवशी आज रविवार असल्याने शासकीय सुट्टी असते म्हणून आम्ही चंद्रपूरला जाऊन मुक्काम करायचे ठरविले. माझा मित्र सुशांत राच्चावार यानी त्याच्या घरी जेवणाचा बेत केला होता, सकाळीच जेवण करुन आम्ही दुपारी १२ वाजता आम्ही चंद्रपूरच्या दिशेने निघालो, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या पर्यटन निवासामध्ये रूम शिल्लक आहे का? याची चौकशी करुन ताडोब्याला जायचं नियोजन केले, रुमची उपलब्धता आहे हे समजल्यावर मूलच्या पुढे गेल्यावर कोळसा गेट फाटा आहे, त्या मार्गे जाण्याचे ठरले पण जाताना समजले की, दुचाकीला परवानगी नाही, म्हणून आम्ही परत माघारी फिरलो आणि साधारणतः ४ वाजता चंद्रपूरमध्ये दाखल झालो. आजचा मुक्काम आम्ही चंद्रपूरमध्ये करुन दुसऱ्या दिवशी सकाळी चंद्रपूरचे काम उरकून यवतमाळला जाण्याचे नियोजन केले होते.

(दि.१४, सोमवार) चौदाव्या दिवशी सकाळी १०.३० वाजता जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर आणि जिल्हापरिषदेमध्ये निवेदन सादर केले, दुपारी १२ वाजता चंद्रपूर शहर सोडून आम्ही घुग्गुस, वणी मार्गे १७० किलोमीटर यवतमाळकडे निघालो. चंद्रपूर वणी मार्गावर दगडी कोळश्याच्या जड वाहतुकीमुळे प्रचंड काळा धुरळा खराब रोड, एका ठिकाणी जोडमोहा या गावाच्या जवळ गेल्यावर हेल्मेटची काच वर असल्याने गाडी चालवत असताना अचानक एक मधमाशी माझ्या हेल्मेटमध्ये घुसली आणि माझ्या उजव्या डोळ्याच्या खाली डंख दिला मी ताबडतोब गाडी रोडच्या खाली घेतली, प्रचंड वेदना व्हायला लागल्या होत्या संतोषनी मधमाशीचा डंख काढला, मी तोंड पाण्याने धुतले पुढे जाऊन हॉटेलात चहा घेतला थोडावेळ थांबलो, आणि यवतमाळला ४.३० ला पोहचलो, जिल्हाधिकारी कार्यालय यवतमाळमध्ये निवासी उप-जिल्हाधिकारी यांची भेट घेतली आणि जिल्हापरिषदेत मा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे निवेदन सादर केले, आजचा मुक्काम मी कारंजा लाड येथे करायचा ठरला, धारव्हामार्गे ९० किलोमीटर आम्ही कारंजा ला पोहोचलो, सुनील गुंडेला हॉटेलची रूम बुक करायला सांगितली होती, त्यामुळे रूम बुक झाली होती, कारंजा बस स्थानकावर पोहचल्यावर सुनील आम्हास हॉटेलकडे घेऊन आला आणि आम्ही जेवण करुन आराम केला व उद्याचे नियोजन वाशीम भेटीचे केले.
(दि.१५, मंगळवार) पंधराव्या दिवशी सकाळी ८.३० वाजता कारंज्यावरून निघालो ७० किलोमीटर वाशिमच्या दिशेने, जिल्हाधिकारी कार्यालय वाशीम आणि जिल्हापरिषदेमध्ये निवेदन सादर केले, दुपारी ११.३० वाजता वाशीम शहर सोडून आम्ही ७० किलोमीटर हिंगोलीकडे निघालो. खराब रोड हिंगोलीला २ वाजता पोहचलो, तासाभरात जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हापरिषदेत निवेदन सादर केले, ९० किलोमीटर संध्याकाळी ५.३० ला आम्ही नांदेडमध्ये पोहोचलो. जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड आणि जिल्हापरिषदेमध्ये निवेदन सादर केले व परभणीत मुक्काम करुन आराम करायचे ठरवले.

(दि.१६, बुधवार) सोळाव्या दिवशी सकाळी १० वाजता जिल्हाधिकारी कार्यालय परभणी आणि जिल्हा परिषदेमध्ये निवेदन सादर केले, दुपारी १२ वाजता गंगाखेड, अहमदपूर चाकूर मार्गाने १५० किलोमीटर लातूरकडे रवाना झालो. अहमदपूर लातूर हा रस्ता इतका खराब होता की आम्ही रस्त्याने चाललोय का खड्ड्यातून तेच समजत नव्हते. ४ वाजता लातूरमध्ये दाखल होऊन जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हापरिषदेमध्ये निवेदन सादर केले. साधारणतः १४० किलोमीटरचा प्रवासकरुन तुळजापूरमार्गे सोलापूरला सायंकाळी ८ वाजता पोहोचलो.

(दि.१७, गुरुवार) सतराव्या दिवशी सकाळी १० वाजता जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर आणि जिल्हापरिषदेमध्ये निवेदन सादर केले, आतापर्यंत जवळजवळ ४३०० किलोमीटरचा आमचा प्रवास झाला होता. गाडी सर्विसिंगला आली होती, दुपारी १२ वाजता उस्मानाबादकडे रवाना झालो. सोलापूरमधून निघतानाच मी विकास मेटे याला रॉयल एम्फिल्डच्या सर्विस सेंटर नाव नोंदणी करण्यास सांगितले होते. २ वाजता उस्मानाबादमध्ये दाखल झालो तडक रॉयल एम्फिल्डच्या सर्विस सेंटरमध्ये गेलो आणि आमच्या उपक्रमाबद्दल माहिती देऊन गाडी लवकरात लवकर तयार करुन ठेवण्यास विंनती केली, त्यांनीही एका तासात गाडी सर्विसिंग करुन देतो असे आश्वासित केले. दरम्यानच्या वेळेत मी विकासची मोटार सायकल घेऊन जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हापरिषदेमध्ये निवेदन सादर केले, पत्रकारांना भेटी दिल्या हे सर्व काम होईपर्यंत माझी गाडी सर्विसिंग तयार झाली होती.  मी विकासाकडे त्याची गाडी देऊन बीडकडे ५ वाजता मार्गस्थ झालो. सायंकाळी साधारणतः १२० किलोमीटर प्रवास करुन बीडमध्ये साधारणतः ७.४५ वाजता पोहचलो. बीडमध्ये गाड्या चोरीला जातात असे समजले, आम्ही ज्या हॉटेलमध्ये थांबलो होतो, त्या हॉटेलात पार्किंगची सोय नव्हती. गाडी रोडवरच हॉटेलसमोर लावणे होते. हॉटेलच्या व्यवस्थापकास विंनती केली की तुझ्याकडे लोखंडी साखळी असेल तर गाडी बांधून घे. त्यांनी सांगितले की रात्री ११.३० वाजता मी माझी व तुमची गाडी लोखंडी साखळीने बांधून घेतो. पण मला झोप येत नव्हती ११.३० ला मी परत हॉटेल व्यवस्थापकाकडे गेलो आणि त्याला गाडी लोखंडी साखळीने बांधण्याची आठवण करुन दिली. त्याने ११.४५ वाजता माझ्या समोर त्याची व माझी गाडी लोखंडी साखळीने बांधून घेतली मी त्याची खात्री करुन रूम मध्ये झोपायला गेलो. तेव्हा कुठे मला झोप लागली.

(दि.१८, शुक्रवार) अठराव्या दिवशी सकाळी १० ते १२ वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालय बीड आणि जिल्हापरिषदेमध्ये निवेदन सादर केले, आमचे मित्र श्री. मोमीन यांना भेटलो आणि १२ वाजता गेवराई अंबड मार्गे ११० किलोमीटर जालन्याच्या बाजूने रवाना झालो. मध्ये ढाब्यावर जेवण केले,  जालन्याला ४ वाजता पोहचलो निवासी उप-जिल्हाधिकारी यांना भेटून निवेदन सदर केले, जिल्हापरिषद जालना मध्ये निवेदन दिले आणि ६ वाजता आम्ही ७० किलोमीटर औरंगाबादच्या वाटेला मार्गक्रमण केले. जालन्यातून निघताना मी राजेश पुरीला फोन केला, त्याने सांगितले की, उद्या औरंगाबादमध्ये खुलताबाद येथे यात्रा असल्याने औरंगाबाद जिल्ह्यात शासकीय सुट्टी जाहीर केली आहे. पण काहीही पर्याय नव्हता, साधारणपणे ८ वाजता आम्हाला औरंगाबाद बसस्थानकासमोर हॉटेल मिळाले आणि संध्याकाळी जेवण करुन विश्रांती केली. उद्या तर औरंगाबाद मध्ये सुट्टी होती करायचे काय? हा प्रश्न मनात होता. विचारांती उद्या अहमदनगरला जायचे आणि रविवारी पुन्हा औरंगाबादला यायचे नियोजन झाले.

(दि.१९, शनिवार) एकोणिसाव्या दिवशी सकाळी १० वाजता आम्ही १३० किलोमीटर अहमदनगरच्या बाजूने कुच केली, अहमदनगरला दुपारी १ वाजता पोहचलो निवासी उप-जिल्हाधिकारी यांना भेटून निवेदन सदर केले, जिल्हापरिषद अहमदनगरमध्ये निवेदन दिले आणि ५ वाजता पुन्हा आम्ही माघारी औरंगाबादच्या बाजूने निघालो मध्ये नेवासात छोट्या हॉटेल मध्ये मुक्काम केला आणि औरंगाबाद पर्यटन स्थळ असल्याने आणि उद्या रविवार असल्याने औरंगाबाद मधेच काही पर्यटन स्थळांना भेटी देऊ असे ठरले. 

(दि. २०, रविवार) विसाव्या दिवशी सकाळी ८ वाजता नेवाश्यावरून औरंगाबादकडे निघालो. बीबीका मकबरा, पाण्याची चक्की, दौलताबादचा किल्ला, किल्यावर गेलो नाही. किल्याच्या खाली बगीच्यातच थोडावेळ फिरस्ती झाल्यावर सायंकाळी साधारणपणे ८ वाजता आम्हाला औरंगाबाद बसस्थानकासमोर ज्या हॉटेलमध्ये आम्ही पूर्वी थाबलो होतो तिथेच पुन्हा विश्रांती केली. उंची थोडी कामी असल्याने संतोषला गाडीवर बसायचे असेल किंवा उतरायचे असेल तर मला रस्त्यावर कुठे उंचवटा आहे का! हे पाहून गाडी थांबवावी लागत असे.

(दि. २१, सोमवार) एकाविशाव्या दिवशी सकाळी १० ते १२ वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालय औरंगाबाद आणि जिल्हापरिषदेमध्ये निवेदन सादर केले आणि पुण्याच्या बाजूने मार्गस्थ झालो, १ वाजता आम्ही औरंगाबाद सोडले ४ वाजता अहमदनगरमध्ये थोडावेळ थांबून चहा घेतला  आणि पुण्याच्या बाजूने निघालो. रात्री साधारणतः ७ वाजता आम्ही आमच्या घरी पोहचलो होतो. जरी घरी पोहचलो होतो तरी मोहीम आमची अपूर्णच होती, आमचा ३४वा जिल्हा बाकी होता. पुणे

(दि. २८, सोमवार) २८ तारखेला सकाळी मी आणि संतोष जिल्हाधिकारी कार्यालयात गेलोपण जिल्हाधिकारी कार्यालय विधानभवन परिसरात स्थलांतरित झाले आहे असे समजले. तिथून मी विधानभवन मध्ये गेलो जिल्हाधिकारी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत होते जिल्हातील आमदार खासदार पालक मंत्री या बैठकीस उपस्थित होते. मी बैठक कक्षात जाऊन बसलो साधारण ४.३० वाजता बैठक संपल्यावर माझे निवेदन रस्त्यात चालत चालतच मा. जिल्हाधिकाऱ्यांच्या हातात दिले माझा उपक्रम त्यांना सांगितलं, त्यांनी निवासी उपजिल्हाधिकारी यांची भेट घेण्यास सांगितले. निवासी उपजिल्हाधिकारी, श्री. राजेंद्र मुठे यांची भेट घेतली आणि तसेच जिल्हा परिषदेत जाऊन निवेदन जमा केले.

३० तारखेला मी माझा हा उपक्रम पूर्ण झाल्याचे जाहीर केले आणि उपक्रम पूर्ण करण्यात ज्यांनी मला मदत केली यांचे आभार मांडले.

एकूण ५१०० किलोमीटर प्रवास, ३४ जिल्हा मुख्यालयास भेटी, लोकांशी प्रत्यक्ष, भेटीगाठी घेऊन स्थानिक पातळीवर आघाडीवर असलेले दैनिक वृत्तपत्र/आवृत्ती यामध्ये सौर ऊर्जेचा वापर करणेबाबत व माझ्या उपक्रमाबद्दल प्रसिद्धी देऊन जनजागृती करण्याचा प्रयत्न केला. जिल्हा स्तरावरील शासकीय अधिकारी, मित्रपरिवार, सहकारी यांनी आमच्या या उपक्रमाचे कौतुक केले आणि उपक्रमास वेळोवेळी प्रोत्साहन मिळात गेले, त्यामुळेच मी हा उपक्रम अत्यंत यशस्वीरीत्या पूर्ण केला. काही उत्तम विधायक व समाजोपयोगी कार्य करताना व अगोदर कधी न भेटलेल्यांनी एकत्र येऊन, आमच्या या उपक्रमास मदत करणे, हा अनुभव माझ्याकरिता खुपच प्रेरणादायी होता. महिनाभर दुचाकीवरून केलेला प्रवास आणि  दरम्यानच्या भेटीगाठी हे अत्यंत आनंददायी अनुभव होते.

ज्या शासकीय अधिकाऱ्यांशी मी भेटलो, निवेदने सादर केली, त्यांनी देलेली सकारात्मक प्रतिक्रिया, माझ्या उपक्रामाचे कौतुक तसेच सहकार्य व मार्गदर्शन  केल्याबद्दल सर्व प्रशासकिय अधिकारी वर्गाचे आभार मानतो.
महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण, पुणे यांनी प्रत्राद्वारे माझ्या उपक्रमास शुभेच्छा व जिल्हा स्तरावरील शासकिय यंत्रणानी आम्हास सहकार्य करण्याचे आवाहन  केले व वैयक्तिक स्तरावरही मदत करण्याचे आश्वासन दिले  त्यामुळे मी महाउर्जाचे श्री. हेमंत कुलकर्णी, श्री.हेमंत पाटील, श्री.विकास रोडे,  श्री.विनोद शिरसाट, श्री.फडके श्री. अभिजीत हिंगे व श्री. जायभाय यांचे सहित समस्त महाऊर्जाचे  शतशः आभारी आहे.

राज्य व जिल्हा पातळीवर आघाडीवर असलेले दैनिक वृत्तपत्र, साप्ताहिक आणि  मासिक यामध्ये लेखन करणारे पत्रकार मित्र, तसेच स्थानिक दुरचित्रवाणीवरून बातम्या प्रसारण करणारे प्रतिनिधी, यांनी माझ्या उपक्रमास व सौर उर्जा वापराबाबत प्रसिद्धी दिल्याबद्दल, मी सर्व माध्यम प्रतिनिधींचे आभार मानतो. त्यामुळेच मला प्रत्यक्षरीत्या अनेक लोकांपर्यंत सौर ऊर्जेचे महत्त्व पोहचवता आले.

जिल्हा स्तरावरील माझ्या खालील मित्रांनी त्यांच्या व्यस्त वेळातुन न कंटाळता केलेल्या सहकार्याबद्दल मनपूर्वक आभार.
नितिन सपकाळ(सातारा),  सचिन खांडेकर आणि सागर बाबर(सांगली),  प्रदिप  घोडके आणि सचिन पटिल(कोल्हापुर),  हार्दिक शिगले(सिंधुदुर्ग), नितिन पडाळकर आणि श्री. जगदीश चव्हाण(रत्नागिरी), निलेश पाटिल(रायगड), विशाल कुंभार (ठाणे आणि पालघर), दुर्गेश मारु, प्रशांत जोशी, मनोहर चव्हाण, विशाल शिंदे आणि योगेश पगर(नाशिक आणि नंदुरबार), महेंद्र नेरकर, प्रविण नवले आणि सागर जाधव(धुळे), अरुण कोष्टी, निलेश पाटील, शाम दिक्षित, रितेश माळी- सोयो सिस्टिम्स(जळगाव आणि बुलढाणा), श्रीकांत आणि संदिप(अकोला), किशोर काजळकर आणि श्री. मानकर(अमरावती), सचिन ढोणे, सुनिल गुंटे आणि अतुल भांदककर(वर्धा), प्रितेश उचकलवार(नागपुर), सुभाष सतदेव, श्री. तुरस्कर(भंडारा), पुरुषोत्तम बिसेन आणि विनोदकुमार चौधरी(गोंदिया), सुशांत रच्चावार, अनिल कुंटावार, दुर्गेश इंगोले आणि नंदकिशोर नल्लुरवार(गडचिरोली), श्री. दत्ता भाके, संजय कुंभार, हरिश बारे(चंद्रपुर), संदिप फुटाने आणि श्री. राउत(यवतमाळ), गजानन अंभोरे(वाशिम), विशाल(हिंगोली), माधव वाघमारे आणि श्री. दासरी(नांदेड), प्रशांत बेल्लाळे आणि व्यंकट राउतराव(लातुर), विकास मेटे आणि श्री. शिरपुकर(उस्मानाबाद), गिरिश इप्पाकायल(सोलापुर), श्री. मोमिन(बीड), राजेश पुरी(औरंगाबाद), सागर काळे, निलेश गोरे आणि श्री. विकास साळुंखे (अहमदनगर) आणि पुण्यातील अनेक सहकारी. 

जिल्हा स्तरावरील माझ्या मित्रांनी वेळापत्रकानुसार उपक्रमास सहकार्य करण्याकरिता नियोजन केले होते, परंतु नियोजित वेळेच्या अगोदर एक दिवस माझा प्रवास चालला होता त्यामुळे   अनेक माझ्या सहकाऱ्यांना भेटी देता आल्या नाहीत, त्यामुळे त्यांनी मला माफ करावे.

माझ्या या उपक्रमास माझ्या संपुर्ण कुटुंबाकडुनही प्रोत्साहन मिळाले. माझे आई, वडिल, भाऊ, बहिण, पत्नी विशाखा, माझ्या गोड मुली सुरभि आणि स्वानंदि यांनी काहीही कुरबुर न करिता दिलेल्या पाठिंब्यामुळे मी उपक्रम पुर्ण करु शकलो.

मी, श्री. विक्रम कोठारी, व्यवस्थापकीय संचालक, उर्जा फ्युचर सिस्टिम्स (इं) प्रा. लि. पुणे यांनी मला सदर उपक्रमास एक महिन्याची रजा मंजुर करुन उपक्रमास  अप्रत्यक्षपणे दिलेल्या प्रोत्सानाबद्दल मी त्यांचा आभारी आहे. तसेच प्रवासाचे नियोजन करण्यात मार्गदर्शन केल्याबद्दल, मी श्री. अजय गुप्ते यांचे आभार मानतो. उर्जा फ्युचर सिस्टिम्स (इं) प्रा. लि. पुणे यांच्या सर्व स्टाफनी केलेल्या सहकार्याबद्दल, मी उर्जा फ्युचर परिवारचे आभार मानतो.

सर्वात शेवट श्री. संतोष खोमणे यांनी आदल्या दिवशी हॉस्पिटलमधुन डिस्चार्ज घेतला असताना या संपुर्ण प्रवासात माझी साथ दिली, त्यांच्यामुळे माझा हा महत्वकांक्षी उपक्रम यशस्वी होण्यास मदत झाली.
नियोजन वेळेत पूर्ण होईल का? हे शक्य नाही? अशा उपक्रमातून काहीही साध्य होणार नाही! अनावश्यक खटाटोप आहे! जिल्हांना खरंच भेटी देणार का? यापूर्वी आम्ही असे प्रयोग केले होते पण काहीही फायदा झाला नाही, असे अनेक शंका/प्रश्न  उपस्थित करणाऱ्यांनी मला अप्रत्यक्ष प्रोत्साहन दिले. 
माझ्या या संकल्पनेस व सदर उपक्रम उत्तमरीत्या संपन्न करण्यासाठी, आपण सर्वांनी दिलेल्या प्रोत्साहनाबद्दल व विविध माध्यमातुन दिलेल्या असंख्य  शुभेच्छांबद्दल,  मी पुनश्च आपला आभारी आहे. 

सौरभ कुंभार