Friday, January 25, 2019
राज्यात 3200 मेगावॅट सोलार प्रकल्प उभारण्यात येतील
Saturday, November 10, 2018
पारंपरिक वीज वापरात बचत करण्याच्या उद्देशाने राज्यात अटल सौर कृषिपंप योजनेअंतर्गत सात हजार सौर कृषिपंप वाटप होणार...
पारंपरिक वीज वापरात बचत करण्याच्या उद्देशाने राज्यात अटल सौर कृषिपंप योजनेअंतर्गत सात हजार सौर कृषिपंप वाटपास मंत्रिमंडळाने बुधवारी 3 ऑक्टोबर २०१८ रोजी मान्यता दिल्याची माहिती ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली..
ते पुढे म्हणाले, की या योजनेमुळे शेतकऱ्यांना दिवसा पिकांना सिंचन करणे शक्य होईल. ही संपूर्ण योजना महाऊर्जाकडून राबविण्यात येईल. योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या सौर कृषिपंपांपैकी २५ टक्के पंप हे ३ अश्वशक्तीचे, तर ७५ टक्के पंप ५ अश्वशक्तीचे असतील. ३ व ५ अश्वशक्ती पंपांच्या एकूण उद्दिष्टापैकी २२.५ टक्के पंप अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीतील शेतकऱ्यांसाठी राखीव राहणार आहेत. उर्वरित ७७.५ टक्के पंप सर्वसाधारण वर्गातील लाभार्थ्यांसाठी राहतील. पंपापोटी ५ टक्के हिस्सा शेतकऱ्याला भरावा लागणार आहे. ९५ टक्के वाटा केंद्र आणि राज्य शासन उचलणार आहे.
कृषिपंपाचा हमी कालावधी ५ वर्षांचा व सोलर मोड्यूल्सची हमी १० वर्षांची असणार आहे. कृषिपंप पुरवठा धारकावर ५ वर्षांसाठी पूर्ण देखभाल व दुरुस्ती करार करण्याची जबाबदारी टाकण्यात आली आहे. सिंचनाची सोय असलेले शेतकरी या योजनेस पात्र ठरणार आहेत. तसेच, त्या शेतकऱ्याकडे पारंपरिक पद्धतीने वीज जोडणी नसावी. ५ एकरांपर्यंत जमीन असलेल्या शेतकऱ्याला ३ अश्वशक्ती, तर ५ एकरांपेक्षा जास्त जमीन असलेल्या शेतकऱ्याला ५ अश्वशक्तीचा पंप देता येणार आहे.
पारंपरिक ऊर्जेद्वारे विद्युतीकरण न झालेले शेतकरी, वनविभागाचे प्रमाणपत्र न मिळालेले शेतकरी, महावितरणकडे पैसे भरून वीज जोडणी प्रलंबित असलेले शेतकरी, ज्यांना नजीकच्या काळात वीज जोडणी मिळणार नाही असे शेतकरी, अतिदुर्गम भागातील शेतकरी, शासनाच्या धडक सिंचन योजनेचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना या योजनेत प्राधान्य राहील. वैयक्तिक, सामुदायिक शेततळे, बारमाही वाहणारी नदी, नाल्याशेजारील शेत जमीनधारकही या योजनेसाठी पात्र राहतील.
शासनाच्या निकषानुसार लाभार्थ्यांची निवड करण्यासाठी जिल्हा पातळीवर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात येणार आहे. तहसीलदार, जिल्हा कृषी अधीक्षक, समाज कल्याण सहायक आयुक्त, भूजल सर्वेक्षणचे वरिष्ठ वैज्ञानिक, आदिवासी विभागाचे प्रकल्प अधिकारी, महावितरणचे अधीक्षक अभियंता आणि महाऊर्जाचे विभागीय व्यवस्थापक यांचा या समितीत समावेश असेल. राज्य स्तरावरील सुकाणू समितीचे अध्यक्ष प्रधान सचिव, ऊर्जा हे योजनेचे नियंत्रण करणार आहेत.
१४ हजार हेक्टर क्षेत्र येणार सिंचनाखाली
या योजनेअंतर्गत १४ हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली येईल. योजनेमुळे कृषिपंप ग्राहकांना शासनातर्फे देण्यात येणाऱ्या अनुदानामध्ये ६३ कोटींची बचत होईल. क्रॉस सबसिडीही १६८ कोटींनी कमी होईल. वीजदर कमी होतील. पारंपरिक व अपारंपरिक पद्धतीने करण्यात येणाऱ्या वीजनिर्मितीतही बचत होणार आहे. याशिवाय राज्य शासनाद्वारे राज्यात एक लाख सौर कृषिपंप बसवण्यासाठी नवीन योजना तयार करण्यासही मंत्रिमंडळाने या वेळी मान्यता दिली आहे, असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले.
असे असेल पंपांचे वितरण आणि किंमत
३ अश्वशक्ती - २ लाख ४० हजार रुपये किंमत
५ अश्वशक्ती - ३ लाख २५ हजार रुपये किंमत
३ अश्वशक्ती - १७५० पंप बसविणार
५ अश्वशक्ती - ५२५० पंप बसविणार
सौर ऊर्जा क्षेत्रातील शासकीय व इतर संस्था
आपण ह्य़ा अक्षय मिळणाऱ्या सौर ऊर्जेसंबंधी विचार करणार असल्याने सौर ऊर्जा क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांची व सौर ऊर्जा उपकरणे तयार करणाऱ्या निर्मात्यांची
माहिती मिळवणार आहोत, ती पुढीलप्रमाणे आहे. भारतामध्ये इंदोर, चंडीगड, मदुराई, वल्लभ विद्यानगर, कलकत्ता व पुणे येथे क्षेत्रीय परीक्षण केंद्रे कार्यरत आहेत.
या केंद्रांमध्ये विविध अपारंपरिक ऊर्जास्रोत उपकरणांच्या शास्त्रशुद्ध चाचण्या घेऊन उपकरणांच्या कार्यक्षमतेचे प्रमाणपत्र दिले जाते. पुण्यातील क्षेत्रीय केंद्राचा पत्ता पुढीलप्रमाणे. स्कूल ऑफ एनर्जी स्टडिज, भौतिकी विभाग, पुणे विश्वविद्यालय, पुणे ४११ ००७, दूरध्वनी क्रमांक (०२०) ५६५६०६१, ५६५५२०१, ई-मेल : mgt@physics.unipune.emet.in पुणे विद्यापीठात विविध अपारंपरिक ऊर्जास्रोतांविषयी संशोधन केले जाते. जिज्ञासूंनी वरील विभागाशी संपर्क साधल्यास अद्ययावत माहिती व तज्ज्ञांकडून मार्गदर्शन मिळू शकेल. भारत सरकारने केंद्रात दिल्ली येथे एक स्वतंत्र अपारंपरिक ऊर्जा मंत्रालयाची स्थापना केली आहे. त्याला टठफए म्हणतात. म्हणजेच Ministry of New and renewable Energy MNRE (Ministry of New & Renewable Energy)
नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय, ब्लॉक नं. १४, सीजीओ कॉम्प्लेक्स, लोदी रोड, नवी दिल्ली- ११० ००३, फोन ९१११२४३६३०३५, २४३६०७०७, वेब : www.mnre.gov.in
येथून एक अक्षयउर्जा नावाचे मासिकही निघते. त्यात देखील ही ऊर्जा वापरण्यासाठी मिळणाऱ्या सवलती, फायदे व अनुदानांबद्दलची माहिती असते. ह्य़ा सवलती मिळविण्यासाठी महाराष्ट्र शासनातर्फे केंद्राला त्याची शिफारस लागते. ‘नाबाड’ देखील ह्य़ासाठी कर्ज देते. ‘नाबार्ड’ ही संस्था बँकांना कर्ज देते व बँक आपणास कर्ज देते. नाबाड हे कर्ज शेतकऱ्यांना,काही मर्यादित अपारंपरिक ऊर्जा योजनांसाठीच देते.
Monday, November 5, 2018
सेल्फी विथ रांगोळी स्पर्धा !
Thursday, February 15, 2018
सोलर इलेक्ट्रिक सिस्टिम कशी काम करते ?
सोलर सिस्टिम मध्ये Photo Voltaic सेल वापरले जातात. PV सेल हे सेमीकंडक्टर मटेरियल पासून बनवले जातात. या सेल वर प्रकाश पडला असता यामधून इलेक्ट्रॉन चे वहन चालू होते. म्हणजेच वीज निर्मितीला सुरुवात होते. ही वीज DC म्हणजेच डायरेक्ट करंट स्वरूपातील असते, जी बॅटरी मध्ये साठवली जाऊ शकते. ही वीज घरातील उपकरणांसाठी वापरण्यासाठी इन्व्हर्टर चा वापर करून AC म्हणजेच alternating current मध्ये रूपांतरित केली जाते.
ज्या ठिकाणी विजेची उपलब्धता नसेल, परंतु घरगुती उपकरणे, TV , मिक्सर , फ्रिज, इ. वापरायची आहेत तेथे ही सिस्टिम वापरली जाते. या सिस्टिम मध्ये सोलर पॅनल, चार्ज कंट्रोलर, इन्व्हर्टर, बॅटरी वापरली जाते. किती क्षमतेचा पॅनल, इन्व्हर्टर, बॅटरी वापरायची हे उपकरणांच्या energy consumption , तसेच रोज कोणते उपकरण किती तास वापरायचे आहे यावर अवलंबून आहे. या सिस्टिम मध्ये दिवसभर बॅटरी सोलर द्वारे चार्जे करून रात्री वीज वापरू शकतो. या सिस्टिम ला बॅटरी मेन्टेनन्स करण्याची तसेच ३ ते ५ वर्षानंतर बॅटरी बदलण्याची गरज असते.
ही सिस्टिम सोलर off grid सिस्टिम सारखीच असते परंतु यामध्ये सोलर वर तसेच MSEB सप्लाय वर चार्जिंग ची सुविधा असते. या सिस्टिम मध्ये सोलर इन्व्हर्टर वापरला जातो. या सिस्टिम जिथे लोड शेडींग आहे तेथे वीज बिल काही प्रमाणात कमी करण्याच्या दृष्टीने वापरल्या जातात. या सिस्टिम ला बॅटरी मेन्टेनन्स करण्याची तसेच ३ ते ५ वर्षानंतर बॅटरी बदलण्याची गरज असते.
या सोलर सिस्टिम मध्ये सोलर पॅनल आणि सोलर स्ट्रिंग इन्व्हर्टर वापरला जातो. या सिस्टिम मध्ये दिवसभर तयार झालेल्या सोलर ऊर्जेचे रूपांतर अल्टर्नेट करंट मध्ये केले जाते आणि ही वीज MSEB कडे नेट मीटर द्वारे निर्यात केली जाते. रात्रीच्या वेळी ही वीज आयात केली जाते. हे सिस्टिम वीज बिल कमी करण्यासाठी वापरली जाते. ही सिस्टिम वापरण्यासाठी दिवसभर लाईट असणे गरजेचे आहे. जर लाईट नसेल तर ही सिस्टिम वीज निर्यात करू शकत नाही तसेच बॅटरी नसल्यामुळे साठवता तसेच वापरताही येत नाही. या सिस्टिम मध्ये बॅटरी नसल्यामुळे मेंटेनन्स खूप कमी असतो. शहरांमध्ये तसेच जेथे लोड शेडींग नाही अशा ठिकाणी ही सिस्टिम वापराने फायदेशीर ठरू शकते. यासाठी MSEB किंवा स्थानिक वीज वितरण कंपनीची परवानगी घ्यावी.
किंमत रू 90,000/-
किंमत रू 1,80,000/-
किंमत रू 2,70,000/-
व्यावसायिकांची वार्षिक बचत: ७५,०००/-
करामध्ये सवलत: १ लाख पर्यंत
किंमत रू 4,00,000/-
वीज वापर 1200 ते 1250 युनिट प्रति महिना
व्यावसायिकांची वार्षिक बचत: १,५०,०००/-
करामध्ये सवलत: २ लाख पर्यंत
किंमत रू 8,00,000/-
दिवसभर चौकशीसाठी फोन चालु असतो त्यामुळे फक्त whats app संदेश करू शकता.
whats app ९८६०००००४५
Sunday, June 12, 2016
वीज निर्माते व्हा, पैसेही कमवा!
वीज निर्माते व्हा, पैसेही कमवा!
मोठ्या उद्योगांप्रमाणेच घराच्या छतावर ऊर्जानिर्मिती प्रकल्प साकारण्याची योजना महावितरणने आणली आहे. केवळ 75 हजार ते 1 लाख रुपये गुंतवून पैसे www.surbhisystems.in कमावण्याची संधी या उपक्रमाद्वारे सर्वसामान्यांना उपलब्ध झाली आहे. या योजनेतील कायदेशीर अडसरही राज्य शासनाने जाहीर केलेल्या अधिसूचनेमुळे दूर झाला आहे.
सौरऊर्जा निर्मितीची परवानगी आतापर्यंत केवळ उद्योगांनाच होती. आता, मात्र निवासी, वाणिज्य, औद्योगिक वसाहती आणि हाउसिंग सोसायट्यांना छतावर वीजनिर्मिती करता येईल. वापरानंतर वाचलेली वीज महावितरणला विकताही येणार आहे. त्यासाठी आवश्यक संयंत्रे सहज उपलब्ध आहेत. या संयंत्रांपासून दररोज एक ते आठ किलोवॉट वीजनिर्मिती करता येते. सिंगल फेस ग्राहक आठ किलोवॉट, थ्री फेस ग्राहक 150 किलोवॉट वीज निर्माण करू शकतो. www.surbhisystems.in महानगरपालिका हद्दीतील ग्राहक 150 किलोवॉट ते 1 मेगावॅट वीज निर्माण करू शकतो. महापालिका हद्दीबाहेरील ग्राहक 80 किलोवॉट ते 1 मेगावॅट वीजनिर्मिती करू शकतो. दिवसा निर्माण होणारी वीज गरजेपेक्षा निश्चितच अधिक राहील. न वापरलेली वीज नेटमीटरिंगद्वारे महावितरणला विकता येईल.
या योजनेसाठी महावितरणकडे अर्ज करणे आवश्यक आहे. महावितरणने ग्राहकांच्या सुविधेसाठी ऑनलाइन अर्जाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. www.surbhisystems.in लिफ्ट, पाण्याची मोटार व लाइटसाठी ही वीज वापरता येईल. सध्या विजेचा दर सरासरी सात रुपये युनिट असा आहे. या हिशेबाने सोसायटीचे एका युनिटमागे तासाला सात रुपये वाचतील. अधिक माहिती महावितरणच्या www.mahadiscom.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
सौर ऊर्जा : गरम पाणी व विजेला पर्याय
५ तारखेला पर्यावरण दिन आहे. महाराष्ट्र शासन ३ जून ते ९ जून पर्यंत पर्यावरण सप्ताह साजरा करीत आहे त्यानिमित्ताने..............
१) उष्ण उर्जा (Solar Thermal)
२) प्रकाशीय उर्जा (फोटोव्होल्टाइक/Photovoltaic)
दैनंदिन घरगुती वापराकरिता सौर ऊर्जेचा वापर शक्यतो तीन कारणांसाठी करता येतो. त्यापैकी एक म्हणजे गरम पाण्यासाठी ‘सोलर हिटर’ अन्न शिजविण्यासाठी “सोलर कुकर” व घरात लागण्यार्या विजेच्या उपकरणांच्या “वीजनिर्मितीसाठी” करता येऊ शकतो. त्यामुळे सामान्य नागरिक आपल्या दैनंदिन वापराकरिता सौर उर्जेचा उपयोग गरम पाणी, अन्न शिजविण्याकरिता व वीज वापर करण्याकरिता करू शकतात आणि नैसर्गिक ऊर्जेचा लाभ घेऊन बचतीचा नवा मार्ग अवलंबू शकतात.
१) सौर उष्ण जल प्रणाली (Solar Water Heating System).
आंघोळीसाठी बहुतेक कुटुंबातून गरम पाण्याचा वापर केला जातो. हे गरम पाणी करण्यासाठी गावी बंब अथवा चुलीवर गरम पाणी करण्याची पद्धत आजही अस्तित्वात आहे. तसंच शहरी भागात इलेक्ट्रिक गिझर, गॅस गिझर अथवा गॅस शेगडीचा वापर केला जात आहे. पण दिवसेंदिवस इंधनटंचाई, वीजटंचाईची समस्या गंभीर होताना आपण पाहत आहोत. तसंच इंधनाचे साठे मर्यादित असल्याचेही संकेत आपल्याला मिळू लागले आहेत. इंधनांवर असलेल्या मर्यादा आणि उपलब्धता यामुळे स्वयंपाकाचा गॅस, केरोसीन, पेट्रोल, डिझेल इत्यादींच्या किमती झपाटय़ाने वाढत आहेत. विजेचं भारनियमन वाढलं आणि चौदा तासांपर्यंत वीज नाहीशी होऊ लागली. त्यामुळे सकाळी आंघोळीसाठी गरम पाणी मिळवण्यात अडचणी समोर येऊ लागल्या. या सर्व अडचणी सर्वत्रच सारख्या आहेत. त्यामुळे या समस्येवर उपाय आहे सौरबंब म्हणजेच सोलर वॉटर हीटर. सूर्यापासून येणाऱ्या उष्ण ऊर्जेचा वापर पाणी गरम करण्यासाठी उपयोग केला जातो. या प्रकारात सूर्यापासून येणारी उष्णता हिटिंग पॅनेल/नाळ्यामध्ये घेऊन सहजरीत्या थंड पाणी ८० अंश से. पर्यंत उष्ण करता येऊ शकते. यामध्ये कोणताही इंधनखर्च, वीजखर्च लागत नसून अतिशय कमी देखभाल खर्च लागतो. या सिस्टीमचे आयुष्य साधारणपणे ८ ते १० वर्षे असते. फक्त सुरुवातीला एकदाच गुंतवणुकीची गरज असते.
जसा, आज खोट्या प्रतिष्ठेच्या लोभापायी लोकं ५०-५० हजाराचे मोबाईल घेतात, का तर उंचा मोबाईल वापरणे हे प्रेस्टिज सिंबल (Prestige Symbol) बनलेला आहे (भले, मोबाईल मधील काही समजेना का?). आज मी आवाहन करतो कि जसा उंचा मोबाईल वापरणे हे प्रेस्टिज सिंबल आहे, तसा माझ्या घरावर सौर उर्जेची यंत्रणा बसवलेली आहे. हा हि एक प्रेस्टिज सिंबल बनवा, आपण रोजचे जर ४ युनिट वाचविले तर पर्यायाने आपल्या, जिल्ह्याच्या, राज्याच्या आणि देशाच्या विकासात हातभार लागू शकतो, पण गरज आहे, हा विस्तृत विचार करण्याची...................
सौर ऊर्जेला अनन्यसाधारण महत्त्व का प्राप्त होत आहे, असा जर विचार केला तर असे समजते की भारत देश विषुववृत्ताच्या जवळ आहे. सूर्य विषुववृत्तापासून उत्तरायणात उत्तरेकडे आणि दक्षिणायनात दक्षिणेकडे सरकलेला दिसतो. या काळातही सूर्याकडून येणारे किरण भारतावर पडताना लंबरूप असतात. या किरणांची कार्यक्षमता सर्वाधिक असल्याने भारत हा देश सौर ऊर्जेचा देश म्हणून ओळखला जातो. सुमारे ३२५ दिवस उत्तम सूर्यप्रकाश आणि उष्णता मोफत मिळत असल्याने सौर ऊर्जेच्या वापराकडे सर्व देशवासीयांनी समाजाभिमुख होऊन लक्ष द्यायला हवे. दर दिवशी सूर्याकडून १ चौ.मी. क्षेत्रफळावर १ किलोवॉट प्रतितास एवढी विद्युतऊर्जा मिळत असते. उदाहरणच द्यायचे म्हटले, तर या ऊर्जेत १०० वॉटचा एक दिवा १० तास चालू शकतो, इतकी क्षमता त्यात असते. वीजनिर्मितीकरिता, पाणी गरम करण्याकरिता, अन्न शिजवण्याकरिता, वेगवेगळे पदार्थ वाळवण्याकरिता, औद्योगिक क्षेत्रातील निरनिराळया कामांकरिता आपण या क्षेत्रफळावर पडणाऱ्या सौर ऊर्जेचा वापर करू शकतो. आजमितीला सौर ऊर्जेविषयी भारतात आशादायी वातावरण निर्माण होत आहे. परंतु हा वेग अतिशय मंद आहे. ज्या पध्दतीने ग्लोबल वॉर्मिंगचे चटके बसू लागले आहेत, त्या तुलनेत समाजात त्या विषयीची जागरूकता, त्या विषयीच्या उपाययोजना करण्याबाबत समाजात अनास्था दिसून येत आहे.
एकटया महाराष्ट्राचा विचार करता आपल्याला सुमारे उत्पादित वीज आणि विजेची मागणी यामध्ये पचंड तफावत आहे. परिणामी अनेक खेडेगावांमध्ये भारनियमनाच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे अनेक कारखाने, शेती व्यवसाय, लघुउद्योग अडचणीत आले आहेत. सौर वीजनिर्मिती हा यावर उत्तम पर्याय असून वैयक्तिक पातळीवर सौर वीजयंत्रणा बसवता येणे शक्य आहे. या यंत्रणेकरिता एकदाच गुंतवणूक करावी लागते. गुंतवणूक करताना आपण किती दिवे, पंखे - किती वॉटचे आणि किती काळ चालवणार आहोत, त्यावर वीजनिर्मिती किती झाली पाहिजे ते ठरवले जाते. आजमितीला किमान प्रकाश देणारा छोटा दिवा रु. १२०० पासून बाजारात उपलब्ध आहे. तसेच ३ दिवे आणि १ टेबल फॅन ३-४ तास चालेल अशा प्रकारचे संच फक्त रु. १५,०००/- मध्ये उपलब्ध आहेत.
सौर पथदीप (Solar Street Lamps): डोंगराळ व दुर्गम भागातील रस्त्यांवरच्या दिव्यांसाठी याचा पथदीप म्हणून वापर केला जातो, सूर्यास्त ते सूर्योदय यावर आपोआप चालू व बंद होणारी यंत्रणा यात असल्याने खूप उपयोगाची ठरते.
सौर कंदील (सोलर लॅटर्न्स) (Solar Lanterns): लहान, सुटसुटीत अशी सौर प्रकाश प्रणाली जी आपण कोठेही घेऊन जाऊ शकतो. अंधाऱ्या वाटेवर, शेत, डोंगर भागात वापरण्यास जास्त उपयुक्त ठरते. २ ते ४ तासांपर्यंत सीएफएल (CFL) किंवा एलईडीचा (LED) पांढरा व स्वच्छ प्रकाश मिळतो.
सौर घरगुती दीप (Solar Home Lamps): डोंगराळ, दुर्गम व ज्या भागात वीज पोहोचलेली नाही अशा भागात राहणाऱ्या कुटुंबाना रात्रीच्या वेळी उजेडाकरिता या प्रकारच्या छोट्या सयंत्राचा वापर केला जातो. यामध्ये १ दिव्यापासून ४ दिव्यांपर्यंत गरजेनुसार निवड केली जाते.
1) "ऑफ ग्रीड” यंत्रणा म्हणजे वीज नसतानाही चालविता येणारी यंत्रणा.
2) "ऑन ग्रीड” यंत्रणा म्हणजे वीज आणि सौरऊर्जा यांच्या समन्वयाने चालणारी यंत्रणा.
3) “ऑन ग्रीड विथ बॅटरीबॅकअप” यंत्रणा म्हणजे वीज नसताना ही आणि वीज असतानाही चालणारी यंत्रणा.
या यंत्रणेमध्ये सौरऊर्जेच्या माध्यमातून तयार झालेली ऊर्जा बॅटरीमध्ये साठवून गरजेनुसार वापरता येते. यामध्ये दिवसभरातील लागणाऱ्या ऊर्जेचा वापरही बॅटरीद्वारेच होतो आणि शिल्लक ऊर्जा ही सुद्धा बॅटरीमध्येच साठविली जाते. वीज नसतानासुद्धा बॅटरीमध्ये साठविलेल्या ऊर्जेच्या माध्यमातून आपल्या विजेच्या गरजा भागविता येतात हा या यंत्रणेचा मोठा फायदा असतो. यामधील बॅटरीज या सौरऊर्जा उपलब्ध नसताना नित्याच्या विजेच्या साह्याने सुद्धा चार्ज करता येतात. यामध्ये वीज वितरण कंपनीला देता येणारी वीज ही वेगळ्या पद्धतीने घेतली जाते. कारण बॅटरीमध्ये साठवून ठेवलेली ऊर्जा ही नेट मीटरिंग पद्धतीने देता येत नाही. ही यंत्रणा तुलनेने थोडी महाग असते.
सौरऊर्जेवर तयार होणारी वीज आणि नेहमीची वीज एकत्रितपणे सलग वापरता येते आणि तिचा संयुक्त वापर थांबल्यावर तयार होणारी; पण न वापरली जाणारी शिल्लक ऊर्जा वितरण कंपनीला देण्याची प्रक्रिया चालू होते. यामध्ये नेहमीची वीज नसेल, तर मात्र आपल्या स्वतःच्या गरजा भागविण्यासाठी या ऊर्जेचे निर्माण होण्याची प्रक्रिया कामी येत नाही. एकंदर गरजांचे सुयोग्य मूल्यमापन करून योग्य क्षमतेची यंत्रणा आस्थापित करून घेतल्यास रात्री वापरल्या जाणाऱ्या ऊर्जेची आगाऊ निर्मिती दिवसा करून आणि ती वीज वितरण कंपनीला देऊन त्या दिलेल्या ऊर्जेच्या बदल्यात रात्री आपल्या गरजा भागविण्यासाठीवीजवापर करता येतो. कारण विजेच्या बदल्यात वीज हे समीकरणच आहे या नेट मीटरिंग यंत्रणेचे.
ही यंत्रणा म्हणजे वरील दोन्ही यंत्रणांचा समन्वय. यामध्ये सौरऊर्जेवर तयार होत असलेल्या ऊर्जेतून लागणारी ऊर्जा वापरता येते. वापरत असताना यंत्रणेबरोबर आलेल्या बॅटरीमध्ये साठवता येते आणि त्यानंतर शिल्लक राहणारी ऊर्जा वीज वितरण कंपनीला देता येते.
वापरण्यास अत्यंत सोपी, कोणतेही प्रदूषण न करणारी, भरवशाची, मुबलक प्रमाणात वापरता येणारी, मोफत मिळणारी, घरांघरांवर विद्युत ऊर्जा, उष्णता ऊर्जा देणारी सौर ऊर्जा भारतासाठी अत्यंत महत्त्वाचा आणि शाश्वत असा नैसर्गिक अपारंपरिक स्रोत आहे.
https://amzn.to/2Ryg8wg
सोलर कुकर, सौर वीज यंत्रणा, सौरबंब, सोलर ड्रायर इ. चा वापर करणे म्हणजेच भावी पिढीची सोय करण्यासारखे आहे. सोलर कुकरमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थ शिजतात. महाराष्ट्रात सर्वत्र सोलर कुकरमध्ये अन्न शिजते. महाराष्ट्रातील किमान ५०% कुटुंबे आपापल्या घरी सोलर कुकरचा वापर करू शकतात. याकरिता फक्त मानसिकता बदलणे गरजेचे आहे. आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीत प्रत्येक जण संतुलित आणि पोषक आहाराच्या मागे लागलेला आहे. सूर्यचुलीत तयार झालेल्या अन्नामध्ये जीवनसत्त्व जसेच्या तसे राहत असल्याने अन्नाची चव अतिशय उत्तम लागते. यातून अनेक व्याधी दूर होत असल्याने अनेक वैद्य सौर ऊर्जेवर शिजलेले अन्न खायचे सुचवतात. सुमारे ३०० दिवस कार्यान्वित राहू शकणारा सोलर कुकर एका वर्षातच त्याची किंमत वसूल करून देतो. आपण सकाळी आणि संध्याकाळी काय जेवणार आहोत याचे नियोजन केल्यास दोन वेळचे अन्न आपण त्यावर शिजवू शकतो. उन्हाळयात ९०-१००से, तर हिवाळयात ८५-१०० से.पर्यंत तापमान सूर्यचुलीवर निर्माण होते. त्या तापमानाला दीड ते दोन तासात अन्न शिजून तयार होते. तापमान कमी असल्याने अन्न हळुवार शिजते. त्यामुळे अन्न करपण्याची अथवा जळण्याची शक्यता सूर्यचुलीत नसते. माउंट अबू, तिरुपती बालाजी, शिर्डीचे साईबाबा देवस्थान या ठिकाणी सुमारे ४०-५० हजार भाविकांचा स्वयंपाक सौर ऊर्जेवर होतो. तसेच बिहार, उत्तर प्रदेश या ठिकाणी सोसायटयांमध्ये कम्युनिटी सोलर कुकरचा वापर केला जातो, जेणेकरून संध्याकाळी कामावरून आल्यानंतर या कुकरमध्ये तयार झालेल्या अन्नाचे डबे घरी घेऊन जाता येतात. असेच सोलर कुकर महाराष्ट्रातही सरकारी व खाजगी कार्यालयांत किंवा रहिवासी सोसायटयांमध्ये लावले गेल्यास अब्जावधी रुपयांचे इंधन वाचू शकेल, शिवाय मोठया प्रमाणावर कार्बन डायऑक्साईडची निर्मिती थांबून पर्यावरणाची हानी टळू शकेल.
ह्या कुकरमध्ये रवा व शेंगदाणे उत्तम भाजले जातात व वरण-भात,सर्व प्रकारच्या भाज्या, बटाटे उत्तम शिजते. बाकी मेंटेनन्स शून्य, फक्त रोजच्या रोज एकदा काच स्वच्छ करावी लागते. सोलर वॉटर हिटर प्रमाणेच या कुकरलाही मुबलक स्वच्छ सूर्य प्रकाश असणे गरजेचे आहे. म्हणजेच पावसाळ्यात जेंव्हा आकाश ढगाळ असते व जेंव्हा सूर्यप्रकाश पुरेसा नसतो त्यावेळी हा कुकर अन्न शिजवण्यासाठी वापरता येत नाही.
आज देशात ज्या घरांपर्यत वीज पोहोचली आहे, अशा घरांतही अंधार बघावयास मिळतो, ही अत्यंत खेदकारक गोष्ट आहे. आपला देश समृध्दीकडे जात असताना घरगुती वापरासाठीच्या विजेची पूर्तता आपण करू शकत नाही, म्हणजे कुठेतरी गणित चुकत आहे, असे समजले पाहिजे. त्याविषयी आपण प्रत्येकाने जाणून घेणे महत्त्वाचे आहे. मुख्यतः त्यासाठी मोठया प्रमाणावर - म्हणजेच सुमारे ५०% औष्णिक वीज कोळशाचा वापर करून तयार होते आणि ५०% इतर स्रोतांपासून वीज निर्माण केली जाते. यातील सर्वात खर्चीक, प्रदूषण निर्माण करणारी वीज म्हणजे औष्णिक वीज. १ युनिट वीजनिर्मितीसाठी ८०० ग्रॅम कोळशाचा आणि १० लीटर पाण्याचा वापर केला जातो. शिवाय ज्या ठिकाणी वीजनिर्मिती होते, तेथून ग्राहकापर्यंत पोहोचताना प्रवाहाच्या रोधामुळे 33% वीज खर्च होते, हा यामधील मोठा तोटा आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे सन २०४०-५० च्या दरम्यान कोळशाचे साठे संपुष्टात येतील, असे तज्ज्ञांचे मत आहे. वरील सर्व आकडेवारी पाहता औष्णिक वीज परवडणारी नसून फक्त सरकारी अनुदानामुळे आपल्याला स्वस्त मिळत आहे, हे विसरून चालणार नाही.
आता प्रश्न राहिला तो उपकरण महाग असल्याचा. जितक्या मोठया प्रमाणात या सर्व उपकरणांचा वापर वाढेल, तशा याच्या किंमतीही कमी होतील. सुरुवातीचा मोबाईल अतिसामान्य माणसाला परवडणारा नव्हताच; पण जसा त्याचा वापर वाढला, कॉल कॉस्ट कमी झाली, तशा मोबाइलच्या किमतीही कमी झाल्या. आज सोलर सेलच्या बाबतीतही तसेच झाले आहे. दहा वर्षांपूर्वी ४०० रु. प्रतिवॉट असा असलेला खर्च आज १०० ते १८० रु. प्रतिवॉटच्या दरम्यान खाली आलेला आहे. आता राहिला तो अनुदानाचा प्रश्न. गेल्या वर्षापर्यंत सोलर वॉटर हीटर यंत्रणेवर अनुदान मिळत होते, पण आता ते बंद झालेले आहे. सौर वीज यंत्रणेबाबत अतिदुर्गम भागाकरिता अनुदान दिले जाते. अनुदान म्हणून नाही, पण कमी व्याजदराने राष्ट्रीयीकृत बँका यासाठी कर्ज देतात. त्यासाठी बँकांच्या गरजेनुरूप कागदपत्रांची पूर्तता करावी लागते. याउलट विचार करता असे लक्षात येते की जितका वापर लवकर सुरू होईल, तितकाच लवकर खर्च वसूल होऊन मोफत सेवा मिळू लागेल, हेच आपले अनुदान समजू या आणि अपारंपरिक, कधीही न संपणारी, मोफत मिळणारी सौर ऊर्जा वापरायचा निश्चय करू या.
