Tuesday, April 7, 2020

मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेअंतर्गत शासन निर्णय

मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेअंतर्गत शासन निर्णय



क्लिक : मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजना https://youtu.be/-Gsc54Q8b5I क्लिक : अर्ज करा कसा करावा https://youtu.be/c6thItBrvcQ

पारेषण विरहीत सौर कृषीपंप नविन वीज जोडणी करिता अर्जाची प्रक्रिया.

पारेषण विरहीत सौर कृषीपंप नविन वीज जोडणी करिता अर्जाची प्रक्रिया.

  1. महावितरणाच्या वेब पोर्टलवर (https://www.mahadiscom.in/solar) ऑनलाइन अर्ज करावा.
    • सध्याच्या कृषीपंपाकरिता नवीन वीज जोडणीसाठी पैशाचा भरणा करुन प्रलंबित असलेल्या अर्जदाराने फक्त काही अनिवार्य फील्ड, उदा. अर्ज क्रमांक, पैसे भरल्याची पावती क्रमांक, मंजुरी क्रमांक आणि क्षमतेची मागणी इ. तपशील देणे अनिवार्य आहे.
    • नवीन अर्जदार (परंपरागत कृषीपंप नवीन वीज जोडणीसाठी पैशाचा भरणा केलेला नाही) सर्व फील्ड अनिवार्य आहेत म्हणून तपशील भरणे आवश्यक आहे.
  2. ए - 1 फॉर्मवर संपूर्ण माहिती भरावीे सोबत (कागदपत्रांची प्रत अपलोड करावी)
    • 7/12 उतारा प्रत
    • आधार कार्ड
    • कास्ट प्रमाणपत्र (एससी / एसटी लाभार्थींसाठी)
  3. अर्जदाराने ए - 1 फॉर्मवर व घोषणापत्रावर सही करणे आवश्यक आहे.
  4. ऑनलाइन ए - 1 फॉर्म प्राप्त झाल्यापासून 10 दिवसांच्या आत, सर्वेक्षण केल्यानंतर फील्ड ऑफिसमधून डिमांड नोट जारी केले जाईल. जर काही विसंगती आढळली तर त्यानुसार अर्जदाराला कळविण्यात येईल.
  5. डिमांड नोट देय झाल्यानंतर लाभार्थी एजन्सीचे नाव सादर करेल / देईल (केवळ 25000 निविदासाठी लागू आहे).
  6. प्रत्येक टप्प्यावर अर्जदारांना एसएमएसद्वारे कळविण्यात येईल.

क्लिक : मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजना https://youtu.be/-Gsc54Q8b5I

 क्लिक : अर्ज करा कसा करावा https://youtu.be/c6thItBrvcQ

मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेअंतर्गत लाभार्थी निवडीसाठी पात्रता निकष

 मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेअंतर्गत लाभार्थी पात्रता निकष
1. या योजनेत खालीलप्रमाणे नविन तसेच प्रलंबित अर्जदार पात्र राहतील.
o    पैसे भरुन प्रलंबित असलेले अर्जदार (मार्च 2018 पूर्वी ज्यांना एचव्हीडीएस योजनेमध्ये 2.5 लाखांहून अधिक रकमेच्या पायाभूत सुविधांची आवश्यकता आहे.)
o    31.03.2018 नंतर सर्व पैसे भरुन प्रलंबित असलेले अर्जदार.
o    01.01.2019 पासून कृषी पंपासाठी सर्व नवीन अर्जदार.
o    2.5 लाखापेक्षा कमी रकमेच्या पायाभूत सुविधा लागणाऱ्या एचव्हीडीएस मधील पैसे भरुन प्रलंबित असलेला व या योजनेमध्ये सहभाग घेण्यास इच्छुक असलेला अर्जदार.
2.    लाभार्थी निवडीसाठी पात्रता निकष
o    सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी ज्या शेतकऱ्याकडे शाश्वत जलस्त्रोत उपलब्ध आहे असे सर्व शेतकरी. मात्र अशा शेतकऱ्याकडे पारंपारिक पध्दतीने विद्युत जोडणी झालेली नसावी.
o    5 एकरापर्यंत शेतजमीनधारक शेतकऱ्यास 3 अश्वशक्ती क्षमतेपर्यंत सौर कृषीपंप व 5 एकरापर्यंत जास्त शेतजमीन धारकास शेतकऱ्यास 5 अश्वशक्ती क्षमतेचा सौर कृषीपंप देय आहे.
o    राज्यातील पारंपारिक ऊर्जेद्वारे विद्युतीकरण न झालेले शेतकरी
o    विद्युतीकरणासाठी वन विभागाची ना हरकत प्रमाणपत्र मिळत नसलेले शेतकरी महावितरण कंपनीकडे विद्युत जोडणीसाठी पैसै भरुन ही प्रलंबित असणाऱ्या ग्राहकांपैकी / शेतकऱ्यांपैकी ज्यांना नजीकच्या काळात विद्युत जोडणी मिळणे शक्य नाही असे शेतकरी.
o    अतिदुर्गम भागातील शेतकरी.
o    महाराष्ट्र शासनाच्या सिंचन योजनेअंतर्गत लाभ घेतलेले शेतकरी.
o    वैयक्तिक किंवा सामुदायिक शेततळे, नदी / विहिर / बोअरवेल यांचे शेजारील शेतजमीनधारक शेतकरी या योजनेत पात्र राहतील.
o    सदर योजनेअंतर्गत सौर कृषीपंपासाठी सर्वसाधारण गटाच्या लाभार्थ्यांकडून 10 टक्के व अनुसूचित जातीच्या / अनुसूचित ़जमातीच्या लाभार्थ्यांकरिता 5 टक्के लाभार्थी हिस्सा म्हणून लाभार्थ्यास भरणे आवश्यक आहे.
o    अटल सोलर योजनेमध्ये अर्जदाराने आधी लाभ घेतलेला नसावा.

क्लिक : मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजना https://youtu.be/-Gsc54Q8b5I क्लिक : अर्ज करा कसा करावा https://youtu.be/c6thItBrvcQ

तर्गत माहिती

Thursday, April 2, 2020

CORONA POLICE PERMISSION

• Always carry government approved Identity card you have given in above request. Whenever stopped by police, the concerned person should show their ID card, and kindly cooperate with police on the ground. • You will be liable for prosecution if any false information provided. • This permission is subject to your adherence to various guidelines /orders given by authorities from time to time. • Please note, staying at home is important for your & others health until the lockdown is over. #StayHome #StaySafe • People in quarantine should not apply for Digital Pass, they are requested to #StayHome #StaySafe • आपण वरील विनंतीमध्ये दिलेले शासकीय मान्यताप्राप्त ओळखपत्र नेहमी जवळ बाळगा. पोलिसांनी थांबविल्यास संबंधित व्यक्तीने सदर ओळखपत्र दाखविणे अनिवार्य आहे. कृपया पोलिसांना सहकार्य करावे. • कोणतीही चुकीची माहिती आढळल्यास कायदेशीर कार्यवाही केली जाईल याची नोंद घ्यावी. • सदर परवानगी तसेच वेळोवेळी अधिकाऱ्यांनी दिलेली विविध मार्गदर्शक तत्त्वे / आदेशांचे पालन करणे आपणावर बंधनकारक राहील. • कृपया लक्षात ठेवा, लॉकडाउनची परिस्थिती संपेपर्यंत आपल्या आणि इतरांच्या आरोग्यासाठी आपले घरी रहाणे महत्वाचे आहे. #घरीरहा #सुरक्षितरहा • क्वारंटाईन करण्यात आलेल्या लोकांनी डिजिटल पास साठी अर्ज करू नये. #घरीरहा #सुरक्षितरहा Link for apply Essential Service E Pass : Maharashtra : https://covid19.mhpolice.in/ Pune City : https://punepolice.in/ #Maharashtra police, #Pune Police, #Digital pass, #Emergency Service Pass, #Essential Service Pass, #LockDown Pass,#E-Pass

Tuesday, March 3, 2020

सौरबंब म्हणजेच सोलर वॉटर हीटर


इंधनाची समस्या दिवसेंदिवस तीव्र होत आहे. स्वयंपाकाचा गॅसकोळसापेट्रोलडिझेल इ. ज्वलनशील पदार्थाचे साठे संपल्याचे संकेत तज्ज्ञ देत आहेत. अशावेळी सौर ऊर्जेवर चालणा-या सौरबंबचा पर्याय उपयुक्त ठरेल. त्याने इंधनाची 60 ते 70 टक्क्यांनी बचत होईल.
आंघोळीसाठी बहुतेक कुटुंबातून गरम पाण्याचा वापर केला जातो. हे गरम पाणी करण्यासाठी गावी बंब अथवा चुलीवर गरम पाणी करण्याची पद्धत आजही अस्तित्वात आहे. तसंच शहरी भागात इलेक्ट्रिक गिझरगॅस गिझर अथवा गॅस शेगडीचा वापर केला जात आहे. पण दिवसेंदिवस इंधनटंचाईवीजटंचाईची समस्या गंभीर होताना आपण पाहत आहोत. तसंच इंधनाचे साठे मर्यादित असल्याचेही संकेत आपल्याला मिळू लागले आहेत. इंधनांवर असलेल्या मर्यादा आणि उपलब्धता यामुळे स्वयंपाकाचा गॅसकेरोसीनपेट्रोलडिझेल इत्यादींच्या किमती झपाटय़ाने वाढत आहेत. वीजटंचाईचं सावट दूर होईल असं 2003 सालापासून बोललं जात आहे. पण विजेचं भारनियमन वाढलं आणि चौदा तासांपर्यंत वीज नाहीशी होऊ लागली. त्यामुळे सकाळी आंघोळीसाठी गरम पाणी मिळवण्यात अडचणी समोर येऊ लागल्या. या सर्व अडचणी सर्वत्रच सारख्या आहेत. त्यामुळे या समस्येवर उपाय आहे सौरबंब. म्हणजेच सोलर वॉटर हीटर. गेल्या तीन वर्षात गुंतवलेल्या रकमेचा परतावा मिळून पुढील काळात ही यंत्रणा मोफत सेवा देते.
सूर्य हा या विषृववृत्तातील ऊर्जेचा महत्त्वाचा स्त्रोत आहे. कधीही वेळ न चुकवता दररोज उष्णता आणि प्रकाश देण्याचं काम अव्याहतपणे करत आहे. या ऊर्जेचा वापर सर्वासाठी होऊ शकत असल्यामुळे निरनिराळ्या क्षेत्रात ही ऊर्जा उपयोगी ठरू शकते. आज पारंपरिक पध्दतीने पाणी गरम करावयाचं झाल्यास एका कुटुंबाला सुमारे 60 किलो लाकूड दर महिन्याला तर एक टन वर्षाला लागतं. एकीकडे जंगलं नष्ट होत असल्याचं बोललं जातंपण जंगलतोड थोपवणं मात्र शक्य होत नसल्याचं दिसून येत आहे. देशाच्या एकूण क्षेत्रफळापैकी 11 टक्के जागेवर जंगल असायला हवं. आजमितीला मात्र 16 टक्के जंगल अस्तित्वात राहिलं आहे. एकीकडे इंधनाची टंचाई तर दुसरीकडे अपव्यय बघावयास मिळतो. स्वयंपाकाचा गॅसकोळसापेट्रोलडिझेल इ. ज्वलनशील पदार्थाचे साठे संपत आल्याचे संकेत तज्ज्ञ देत आहे. आणि म्हणूनच याप्रसंगी सौरऊर्जेचा पर्याय उत्तम ठरणार आहे. सोलर वॉटर हीटर किंवा सौरबंब सर्व स्तरातील कुटुंबांना परवडणारं उपकरण असून भौगोलिक स्थितीप्रमाणे सुमारे 70 डिग्री सेल्सिअसपर्यंत पाणी गरम होतं.

सौरबंब प्रणालीमध्ये साधारणपणे दोन प्रकार आहेत: एफ.पी.सी. Flatt Plate Collector) व ई. टी. सी. (Evacuated Tubular Collector). पकी  एफ.पी.सी. हा प्रकार वर्षांनुवष्रे वापरला जाणारा व संपूर्णत: भारतीय बनावटीचा सौर बंब आहे. तर  ई. टी. सी. हा गेल्या काही वर्षांत लोकप्रिय झालेला पण चिनी बनावटीचा सौरबंब आहे. एफ.पी.सी. हा अधिक मजबूत व जास्त टिकाऊ आहेपण त्यामध्ये वापरल्या जाणाऱ्या तांबे व इतर धातूंमुळे त्याची किंमत थोडी जास्त असते. तसेच धातूच्या पाइपमुळे  पाण्यातील क्षारांचा परिणाम होऊन प्रणाली कालांतराने बंद पडण्याचा धोका असतो. अर्थातठराविक काळाने हे पॅनल्स साफ केल्यास फारशी अडचण येत नाही.
ई. टी. सी. प्रणाली ही वजनाने हलकी व किमतीला तुलनेने बरीचशी कमी असतेपण त्याचबरोबर थोडी नाजूकही असते. तसेच ती काचेच्या नळ्यांची बनविलेली असल्याने जेथे पाणी क्षारयुक्त आहे तेथे जास्त उपयोगाची ठरते. अर्थातप्रत्येक प्रणालीचे आपापले गुण व दोष असल्याने आपली गरजभौगोलिक परिस्थितीपाण्याची गुणवत्ता व सर्वात महत्त्वाचे आपले बजेटया सर्व गोष्टींचा विचार करून निर्णय घेणे योग्य! 

विजेची राष्ट्रीय बचत व्हावी व पर्यावरणास हातभार लागावा म्हणून मी माझ्या घराचा गच्चीवर ३० सप्टेबर २०१२ ला २५० लिटर ई. टी. सी. सौर वॉटर हिटर बसवून घेतला आहे व तेंव्हा पासून आजतागायत आम्हाला २४x३६५ केव्हाही गरम पाणी मिळते. सौर वॉटर हिटर बसवण्यासाठी प्लंबिंग कामासह एकूण खर्च रुपये २५,०००/-(दरमहाची गिझर वीज बचत किमान १०००/- पेक्षा जास्त होत आहे) (हे सयंत्र बसविण्यासाठी गच्चीवर लागणारी जागा १०' x ') गेल्या ८ वर्षात फक्त एकदाही खर्च आला नाही. बाकी मेंटेनन्स शून्यफक्त महिन्यातून एकदा काच स्वच्छ करावी लागते. (काही वर्षापूर्वी मी केलेल्या गुंतवणुकीची पूर्णपणे वसुली झालेली असून अजूनही पुढील काही वर्षे निश्चित मला गरम पाणी मिळू शकेल.)
सोलर काचेच्या नळ्यावर पक्षी विष्ठा टाकतात किंवा नळ्यावर धूळीचा थर बसून पुरेसे ऊन नळ्यांवर पंडत नाहीत्यावेळी पाणी गरम होण्यास जास्त वेळ लागतो. ( म्हणूनच महिन्यातून एकदा काच पाण्याने धुवून स्वच्छ करावी लागते).
या मर्यादा लक्षात घेऊन जर ह्या सौर वॉटर हिटरचा वापर केला तर तुम्हाला चोवीस तास केंव्हाही गरम पाणी तर मिळेलच पण तीन वर्षात केलेला खर्च भरून निघेल व उर्वरित आयुष्यभर जवळपास मोफत गरम पाणी मिळेल हे नक्की.

मीहीअपारंपारिक ऊर्जा क्षेत्रात काम करीत असल्याने अपारंपारिक ऊर्जा वापराबाबत सर्वसाधारण महत्त्व आणि गांभीर्य मला माहीत आहे.   

सौरभ लक्ष्मण कुंभार
९८६०००००४५




Wednesday, February 26, 2020

MS-CIT च का ?

MS-CIT च का ?

जगात आय.टी. क्षेत्रात भारताचे नाव सुवर्णाक्षरांनी कोरणाऱ्या ‘परम’ महासंगणकाचे निर्माते तसेच जागतिक दर्जाचे आय.टी. तज्ञ डॉ. विजय भटकरसर व डॉ. विवेक सावंतसर यांच्या मार्गदर्शनाखाली बनविलेला अभ्यासक्रम.
MKCL ही महाराष्ट्र शासनाची अधिकृत संस्था आहे …..
( महाराष्ट्र राज्य उच्च तंत्रशिक्षण मंडळ – MSBTE )

MKCL देशभरात – केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशाच्या इतर राज्यांमध्येही त्या त्या राज्यांच्या मातृभाषेत MS-CIT कोर्स चालविला जातो. ( RS-CIT, OS-CIT, HS-CIT, TS-CIT, MS-CIT etc.. )
MKCL आंतरराष्ट्रीय – केवळ भारतातच नव्हे तर भारताबाहेर UAE (दुबई), सौदी अरेबिया, घाना, युरोप, इजिप्त, श्रीलंका या देशांमध्येही या अभ्यासक्रमांचे यशस्वी संचालन.
अशाप्रकारे MKCL ही जगातील अव्वल दर्जाची संस्था असून ERA या जगभरात लोकप्रिय असणाऱ्या शिक्षण प्रणालीच्या माध्यमातून शिक्षण देते.
शासनाच्या GR नुसार शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांना
MS-CIT अनिवार्य आहे.
डिप्लोमा इंजिनीअरिंग साठी प्रवेश घेणाऱ्या विध्यार्थ्यांना CMF ह्या विषयाचा पेपर द्यावा लागत नाही.
MS-CIT च्या अभ्यासक्रमातील अत्याधुनिक सोफ्टवेअर जसे मायक्रोसॉफ्ट विन्डोज 10 व मायक्रोसॉफ्ट ऑफिस 2013 हे फक्त MS-CIT मध्येच समाविष्ट
कोर्स साठी लागणारे सोफ्टवेअर हे अधिकृत (Licence Copy) असल्याने सन्मानाने शिक्षण
MS-CIT च्या प्रत्येक केंद्रात अत्याधुनिक कंप्युटर ची व्यवस्था
MS-CIT च्या प्रत्येक केंद्रात लाईट गेल्यास पर्यायी व्यवस्था म्हणून UPS ची सोय
MS-CIT ची परीक्षा शासनाच्या MSBTE बोर्डाकडून घेतली जाते.
MS-CIT केंद्रात असतात MKCL OnCeT सर्टिफाईड प्रशिक्षक.
MS-CIT केंद्रात असतो प्रत्येक विद्यर्थ्याला स्वतंत्र कंप्युटर व मिळतो पुरेसा वेळ.
MS-CIT कोर्स सोबत इंग्रजी व मराठी कॉम्पुटराइज टायपिंग कोर्स (प्रमाणपत्रासह)
MS-CIT परीक्षा दिल्यानंतर त्वरित प्रोविजनल सर्टिफिकेट तसेच अल्पावधीतच फायनल सर्टिफिकेट
माध्यमिक शाळेच्या विद्यार्थ्याना ICT साठी MS-CIT केल्यास फायद्याचेच परंतु ICT चा पुढचा टप्पा म्हणून विद्यार्थ्यांची MS-CIT लाच पसंती.
या तसेच इतर अनेक वैशिष्ट्यांमुळे MS-CIT आहे आंतरराष्ट्रीय दर्जाचा परिपूर्ण कंप्युटर कोर्स.
असे असतानाही अनेक प्रयत्न करूनही MS-CIT केंद्र मिळण्यास अपात्र ठरणाऱ्या काही संस्था चालकांकडून विद्यार्थी तसेच पालकांची दिशाभूल करून MS-CIT बरोबर नामसाधर्म्य असणारे कोर्सेस थोपवण्याचा प्रयत्न केला जात आहे. तरी जागरूक विद्यार्थी व पालकांनी आपली फसवणूक टाळावी व अधिकृत केंद्रातच आपला प्रवेश निश्चित करावा…..

एस. के. कॉम्प्युटर्स
(महाराष्ट्र ज्ञान महामंडळाचे अधिकृत MS-CIT संगणक प्रशिक्षण केंद्र)
“पित्रुपुण्य़ाय” १८/२०, उषःक़ाल हौसिंग सोसा. (पोस्टल कॉलनी), महंमदवाडी पोलीस चौकीसमोर, तरवडेवस्ती, महंमदवाडी, पुणे – ४११०६०. भ्रमणध्वनी-९८६०००००४५
Website : https://skcomputers-theinstitute.business.site
Map : https://g.co/kgs/teFohDTo

#Mscit,#mkcl,#MSCIT, #SKCOMPUTERS, #hadapsar, #Mohammadwadi, #computertraining,#MKCL,

Saturday, February 22, 2020

पर्याय स्वंयपाकाच्या गॅसला


पर्याय स्वंयपाकाच्या गॅसला
सबसिडीचे सहा सिलेंडर आणि गॅस च्या किंमतीत दिवसेंदिवस होणाऱ्या भावावाढी मुळे आता स्वंयपाकाच्या गॅस ला पर्याय शोधणं गरजेचं झालं आहे. अद्यावत तंत्रज्ञानामूळे स्वंयपाक घरात नाना प्रकारची उपकरणं आली. कॉफी मेकर, सॅण्डविच मेकर, राईस कुकर, ओव्हन, मायक्रोव्हेव यासारख्या अत्याधुनिक उपकरणांनी स्वयंपाक घरं सजली, तरी स्वंयपाकाच्या गॅसला रास्त आणि स्वस्त पर्यायाविषयी बरेच जण अनभिज्ञ आहेत. काही पर्याय माहीत असले तरी त्याची जुजबी माहीती आणि शंका यामुळे सामान्य माणुस या पर्यायांचा अवलंब करताना कचरतात. परंतु आता सर्वांनाच याची गरज वाटू लागली आहे. सोलार कूकर , इंडक्शन कुकर आणि हॅलोजन कूकर या काही पर्यायांनी आपण गॅस बरोबरच वीज बचत करून स्वादिष्ट अन्न जरुर करु शकतो.
भारतात वर्षभर भरपूर सुर्य प्रकाश उपलब्ध असतो. आपल्या आर्थिक विकासासाठी तसेच घरघुती वापरासाठी आपण या उर्जेचा उपोयोग करु शकतो. सुर्यापासून भारताच्या भुमीवर प्रत्येक चौरसमीटरवर एका तासात सधारपणे ५ ते ७ किलोवॅट इतकी सौर उर्जा उपलब्ध होते. म्हणजेच वर्षभरात ६०,००० अब्ज मेगावॅट अवर इतकी उर्जा विनामुल्य आपल्याला उपलब्ध होते आणि आपण ही उर्जा वाया घालवतो. हीच उर्जा आपण जर सौर उपकरणां मार्फत उपोयोगात आणली तर खर्चिक इंधन आणि विजेचा प्रश्न निकालात निघेल

इंडक्श्न कुकर :
इंडक्श्न कुकर हा विजेवर चालणारा आहे. यात उपकरणात आलेली विज थेट भांड्यात जाते त्यामुळे अन्न पटकन शिजते. यात फक्त कुकरचा भांड्याखालाचा पृष्ठभाग गरम होतो आणि भांड्य़ात ही ज्या पातळी पर्यंत अन आहे, त्या पातळी पर्यंतच भांडे गरम होते. म्हणजेच तुम्ही भांडे हाताने ही उचलू शकता. इडक्श्न कुकर electro magnetic induction technology वर आधारित आहे. इडक्श्न कुकर ला जरी २००० वॅट उर्जा लागत असली तरी त्यावरील अन्न पटकन शिजते त्यामूळे विज बचत होते. उदा. जर २००० वॅट चा इंडक्श्न कुकर १ तास चालला तर तर विजेचे २ युनिट खर्च होतील. आणि जर विजचे दर पर युनिट ६ रुपये पकडला तर २ युनिट साठी आपण १२ रुपये खर्च करतो. या कुकरची स्वछता पटकन करता येते, या कुकरसाठी विशिष्ठ प्रकारची आणी सपाट पॄष्ठ भाग असलेली भांडी वापरावी लागतात. साधारण ३००० ते ४३०० रुपायां पर्यंत इडक्श्न कुकर उपलब्ध आहे. यात बजाज , फिलिप्स यासारखी ब्रॅण्डेड तसेच नॉन ब्रॅण्डेड कंपन्याचे इंडक्श्न कुकर आहेत.
हॅलोजन कुकर :
पाश्चिमात्य देशात सध्या हॅलोजन कुकर च्या नवनवीन रेंज आलेल्या आहेत. भारतात ही हॅलोजन कूकरचा पर्याय उपलब्ध आहेत. हॅलोजन कूकर मध्ये हॅलोजन बल्बचा वापर करण्यात येतो. हॅलोजन बल्ब पटकन तापत असल्याने त्यापासून निर्माण होणाऱ्या उष्णतेने अन्न पटकन शिजते. हॅलोजन कुकर वेगवेगळ्या आकारात उपलब्ध आहे. मायक्रोव्हेव अवन तसेच इडक्शन कूकर सारख्याच आकारात उपलब्ध आहे. यात ही टेमप्रेचर नियंत्रीत करण्याची सोय आहे. साधारणत: २००० रुपायां पासून पूढे हॅलोजन कुकर च्या किंमती आहे
ही नवनवीन उत्पादनांची खरेदी करताना चोखंदळ ग्राहकांनी सर्व बाबींची खातरजमा करणं आवश्यक आहे. उत्पादनांची वॉरन्टी, गॅरन्टी तसेच मॅन्टेन्स कॉस्ट या सर्व गॊष्टींची पडताळणी गरजेचं आहे. याबरोबरच आय. एस. आय. प्रमाणित आणि ५ स्टार चिन्हांकीत उत्पादनेच खरेदी करा.