Saturday, November 10, 2018

पारंपरिक वीज वापरात बचत करण्याच्या उद्देशाने राज्यात अटल सौर कृषिपंप योजनेअंतर्गत सात हजार सौर कृषिपंप वाटप होणार...

पारंपरिक वीज वापरात बचत करण्याच्या उद्देशाने राज्यात अटल सौर कृषिपंप योजनेअंतर्गत सात हजार सौर कृषिपंप वाटपास मंत्रिमंडळाने बुधवारी 3 ऑक्टोबर २०१८ रोजी  मान्यता दिल्याची माहिती ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली..
ते पुढे म्हणाले, की या योजनेमुळे शेतकऱ्यांना दिवसा पिकांना सिंचन करणे शक्य होईल. ही संपूर्ण योजना महाऊर्जाकडून राबविण्यात येईल. योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या सौर कृषिपंपांपैकी २५ टक्के पंप हे ३ अश्वशक्तीचे, तर ७५ टक्के पंप ५ अश्वशक्तीचे असतील. ३ व ५ अश्वशक्ती पंपांच्या एकूण उद्दिष्टापैकी २२.५ टक्के पंप अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीतील शेतकऱ्यांसाठी राखीव राहणार आहेत. उर्वरित ७७.५ टक्के पंप सर्वसाधारण वर्गातील लाभार्थ्यांसाठी राहतील. पंपापोटी ५ टक्के हिस्सा शेतकऱ्याला भरावा लागणार आहे. ९५ टक्के वाटा  केंद्र आणि राज्य शासन उचलणार आहे.
   कृषिपंपाचा हमी कालावधी ५ वर्षांचा व सोलर मोड्यूल्सची हमी १० वर्षांची असणार आहे. कृषिपंप पुरवठा धारकावर ५ वर्षांसाठी पूर्ण देखभाल व दुरुस्ती करार करण्याची जबाबदारी टाकण्यात आली आहे. सिंचनाची सोय असलेले शेतकरी या योजनेस पात्र ठरणार आहेत. तसेच, त्या शेतकऱ्याकडे पारंपरिक पद्धतीने वीज जोडणी नसावी. ५ एकरांपर्यंत जमीन असलेल्या शेतकऱ्याला ३ अश्वशक्ती, तर ५ एकरांपेक्षा जास्त जमीन असलेल्या शेतकऱ्याला ५ अश्वशक्तीचा पंप देता येणार आहे.
   पारंपरिक ऊर्जेद्वारे विद्युतीकरण न झालेले शेतकरी, वनविभागाचे प्रमाणपत्र न मिळालेले शेतकरी, महावितरणकडे पैसे भरून वीज जोडणी प्रलंबित असलेले शेतकरी, ज्यांना नजीकच्या काळात वीज जोडणी मिळणार नाही असे शेतकरी, अतिदुर्गम भागातील शेतकरी, शासनाच्या धडक सिंचन योजनेचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना या योजनेत प्राधान्य राहील. वैयक्तिक, सामुदायिक शेततळे, बारमाही वाहणारी नदी, नाल्याशेजारील शेत जमीनधारकही या योजनेसाठी पात्र राहतील.
    शासनाच्या निकषानुसार लाभार्थ्यांची निवड करण्यासाठी जिल्हा पातळीवर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात येणार आहे. तहसीलदार, जिल्हा कृषी अधीक्षक, समाज कल्याण सहायक आयुक्त, भूजल सर्वेक्षणचे वरिष्ठ वैज्ञानिक, आदिवासी विभागाचे प्रकल्प अधिकारी, महावितरणचे अधीक्षक अभियंता आणि महाऊर्जाचे विभागीय व्यवस्थापक यांचा या समितीत समावेश असेल. राज्य स्तरावरील सुकाणू समितीचे अध्यक्ष प्रधान सचिव, ऊर्जा हे योजनेचे नियंत्रण करणार आहेत.
१४ हजार हेक्टर क्षेत्र येणार सिंचनाखाली
    या योजनेअंतर्गत १४ हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली येईल. योजनेमुळे कृषिपंप ग्राहकांना शासनातर्फे देण्यात येणाऱ्या अनुदानामध्ये ६३ कोटींची बचत होईल. क्रॉस सबसिडीही १६८ कोटींनी कमी होईल. वीजदर कमी होतील. पारंपरिक व अपारंपरिक पद्धतीने करण्यात येणाऱ्या वीजनिर्मितीतही बचत होणार आहे. याशिवाय राज्य शासनाद्वारे राज्यात एक लाख सौर कृषिपंप बसवण्यासाठी नवीन योजना तयार करण्यासही मंत्रिमंडळाने या वेळी मान्यता दिली आहे, असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले.
 असे असेल पंपांचे वितरण आणि     किंमत
३ अश्‍वशक्ती   -  २ लाख ४० हजार रुपये किंमत
५ अश्‍वशक्ती  -  ३ लाख २५ हजार रुपये किंमत
३ अश्‍वशक्ती  -  १७५० पंप बसविणार
५ अश्‍वशक्ती  -  ५२५० पंप बसविणार

सौर ऊर्जा क्षेत्रातील शासकीय व इतर संस्था

केंद्र शासनाने अपारंपरिक ऊर्जास्रोत मंत्रालय निर्माण केले आहे व प्रत्येक राज्याने राज्य पातळीवर ऊर्जा विकास अभिकरण स्थापन केले आहे. महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण (महाऊर्जा मंडळ) ही स्वायत्त संस्था १९८५ साली स्थापन केली. हे अभिकरण खालील अपारंपरिक ऊर्जास्रोतांच्या विकासासाठी काम करते. 
आपण ह्य़ा अक्षय मिळणाऱ्या सौर ऊर्जेसंबंधी विचार करणार असल्याने सौर ऊर्जा क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांची व सौर ऊर्जा उपकरणे तयार करणाऱ्या निर्मात्यांची 
माहिती मिळवणार आहोत, ती पुढीलप्रमाणे आहे. भारतामध्ये इंदोर, चंडीगड, मदुराई, वल्लभ विद्यानगर, कलकत्ता व पुणे येथे क्षेत्रीय परीक्षण केंद्रे कार्यरत आहेत. 
या केंद्रांमध्ये विविध अपारंपरिक ऊर्जास्रोत उपकरणांच्या शास्त्रशुद्ध चाचण्या घेऊन उपकरणांच्या कार्यक्षमतेचे प्रमाणपत्र दिले जाते. पुण्यातील क्षेत्रीय केंद्राचा पत्ता पुढीलप्रमाणे. स्कूल ऑफ एनर्जी स्टडिज, भौतिकी विभाग, पुणे विश्वविद्यालय, पुणे ४११ ००७, दूरध्वनी क्रमांक (०२०) ५६५६०६१, ५६५५२०१, ई-मेल : mgt@physics.unipune.emet.in  पुणे विद्यापीठात विविध अपारंपरिक ऊर्जास्रोतांविषयी संशोधन केले जाते. जिज्ञासूंनी वरील विभागाशी संपर्क साधल्यास अद्ययावत माहिती व तज्ज्ञांकडून मार्गदर्शन मिळू शकेल. भारत सरकारने केंद्रात दिल्ली येथे एक स्वतंत्र अपारंपरिक ऊर्जा मंत्रालयाची स्थापना केली आहे. त्याला टठफए म्हणतात. म्हणजेच Ministry of New and renewable Energy  MNRE (Ministry of New & Renewable Energy)
नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय, ब्लॉक नं. १४, सीजीओ कॉम्प्लेक्स, लोदी रोड, नवी दिल्ली- ११० ००३, फोन ९१११२४३६३०३५, २४३६०७०७, वेब : www.mnre.gov.in
येथून एक अक्षयउर्जा नावाचे  मासिकही निघते. त्यात देखील ही ऊर्जा वापरण्यासाठी मिळणाऱ्या सवलती, फायदे व अनुदानांबद्दलची माहिती असते. ह्य़ा सवलती मिळविण्यासाठी महाराष्ट्र शासनातर्फे केंद्राला त्याची शिफारस लागते. ‘नाबाड’ देखील ह्य़ासाठी कर्ज देते. ‘नाबार्ड’ ही संस्था बँकांना कर्ज देते व बँक आपणास कर्ज देते. नाबाड हे कर्ज शेतकऱ्यांना,काही मर्यादित अपारंपरिक ऊर्जा योजनांसाठीच देते.    

Monday, November 5, 2018

सेल्फी विथ रांगोळी स्पर्धा !

दिवाळीचा सण, करू या रांगोळीच्या रंगांची उधळण.

सहभागी व्हा फक्त एक सेल्फी पाठवून ...............

तुम्हाला, तुमच्या आईला, ताईला किंवा इतरांना जर रांगोळी काढता येत असेल तर या दिवाळीत तुमच्या रांगोळीसोबत एक सेल्फी पाठवा आणि बनू शकाल तुमच्या तालुक्यातील/जिल्ह्यातील सेल्फी-विथ-रांगोळी' स्पर्धेचे विजेते. 

"सेल्फी विथ रांगोळी स्पर्धा, पुणे"
दिनांक १ नोव्हेंबर ते १५ नोव्हेंबर दरम्यान ही स्पर्धा पुणे विभागामधील MS-CIT व KLiCच्या सर्व अधिकृत केंद्रांमार्फत ही स्पर्धा राबवली जाईल.
या स्पर्धेमध्ये कोणीही सहभागी होऊ शकतात त्यासाठी कोणतीही वयोगटाची अट किंवा वयाची वर्गवारी नसणार आहे.
ही स्पर्धा केवळ WhatsApp माध्यमाचा वापर करून घेतली जाणार आहे त्यामुळे प्रत्यक्ष रांगोळी स्पर्धा भरवली जाणार नाही. 
स्पर्धकाने दीपावलीच्या काळात आपल्या घरी काढण्यात आलेल्या रांगोळीचा फोटो केंद्राच्या WhatsApp नंबरवर आपल्या नावासहित पाठवून स्पर्धेतला आपला सहभाग नोंदवू शकतात. 

Whatsapp no. 9860000045

या स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व स्पर्धकांना MKCL, पुणे विभागातर्फे प्रमाणपत्र दिले जाईल.  

अधिक माहितीसाठी आजच आपल्या शासन मान्यताप्राप्त MS-CIT प्रशिक्षण केंद्र. एस. के. कॉम्प्युटर्स मधे संपर्क साधा.

एस. के. कॉम्प्युटर्स, उषःक़ाल हौसिंग सोसा. कृष्णानगर रोड, महंमदवाडी पोलीस चौकीसमोर, तरवडेवस्ती, महंमदवाडी, पुणे – ६०. "माय ऊर्जा" शॉपी शेजारी
फोन:02026970964 / 8411900045

Click here and visit

Locations: